“राज्यात कंत्राटदाराचं सरकार”; ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली…

मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्या घोटाळ्यावरूनही शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे बिना टेंडरची कामं कॉन्ट्रॅक्टरना देण्याचं घोटाळ्याचं कामही हे सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

राज्यात कंत्राटदाराचं सरकार; ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली...
| Updated on: Apr 04, 2023 | 3:24 PM

मुंबईः राज्यात स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य सरकार असल्याची टीका करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुंबई महानगरपालिकेत मोठा घोटाळा सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
राज्यासह मुंबईत कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. मात्र ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यासह मुंबईचीही त्यांनी आणि तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काळजी घेतली.

त्याकाळात ज्या प्रकारे कोरोनाची कामं झाली, त्यावर टीका करतात मात्र आताचे आरोग्य मंत्री मुंबईसाठी काय करतात हे त्यांनी एकदा दाखवून द्यावं अशी टीकाही त्यांनी आरोग्य मंत्र्यांवर केली आहे.

कोविडची प्रकरण वाढत असल्याने मुंबईत आता त्याचा धोका वाढला आहे. त्यावर आरोग्य मंत्र्यांनी कितीवेळी बैठका घेतल्या आहेत असा सवाल त्यांनी आरोग्य मंत्र्यांना केला आहे.

हे सरकार लोकांसाठी कमी आणि स्वतःसाठी जास्त कारभार करणारं सरकार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या याच वृत्तीमुळे नागरिकांना त्यांना सुरक्षित ठेवायचं नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्या घोटाळ्यावरूनही शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे बिना टेंडरची कामं कॉन्ट्रॅक्टरना देण्याचं घोटाळ्याचं कामही हे सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी टीका करताना म्हटले आहे की, हे सरकार स्वतःच्या फायद्यासाठी आपली कामं करणारे सरकार आहे. त्यामुळे या सरकारला लोकांच्या कामाचं काहीही पडलं नाही. त्याच मुळे कितीतरी कोटीचा घोटाळा मुंबई महानगरपालिकेत केला गेल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.