AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम असं का म्हणाले?

या मुलाखतीत संजय दत्त 1993 सली झालेले बॉम्बस्फोट रोखू शकला असता का? असा प्रश्न उज्ज्वल निकम यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर उज्ज्वल निकम यांनी दिले आहे.

संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम असं का म्हणाले?
ujjwal nikam and sanjay duttImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 10:08 PM
Share

Sanjay Dutt : बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव सध्या आपल्या प्रहार या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव याने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. एकीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वरिष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी 1993 सली झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोटांवर महत्त्वाचे असे केले आहे. तसेच त्यांनी अभिनेता संजय दत्त याच्याविषयीही महत्त्वाचं विधान केलं आहे. उज्वल निकम यांनी द लल्लनटॉपला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी 1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोटाविषयी तसेच त्याकाळी संजय दत्तवर झालेल्या आरोपांविषयी मत व्यक्त केले आहे. उज्ज्वल निकम यांच्या मतानुसार संजय दत्तने त्याच वेळी समजदारी दाखवली असती, तर मुंबईमध्ये झालेले बॉम्बस्फोट रोखले गेले असते. शेकडे लोकांचा प्राण वाचला असता.

उज्ज्वल निकम नेमका काय म्हणाले?

या मुलाखतीत संजय दत्त 1993 सली झालेले बॉम्बस्फोट रोखू शकला असता का? असा प्रश्न उज्ज्वल निकम यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना उज्ज्वल निकम म्हणाले की, बॉम्बस्फोट होण्याआधी अबू सालेम एका टेम्पोमध्ये मोठे शस्त्र घेऊन आला होता. या शस्त्रांमध्ये अनेक हँड ग्रेनेड, एके-47 रायफल यांचा समावेश होता. संजय दत्तने यापैकी काही शस्त्र आपल्याजवळ ठेवले होते. यातील हॅन्ड ग्रेनेड नंतर त्याने परत केले होते, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी यावेळी दिली.

पोलिसांनी कातडीने कारवाई केली असती

तसेच पुढे बोलताना संजय दत्तला या शस्त्रांविषयी माहिती होतं. हीच माहिती जर त्याने पोलिसांना दिली असती तर दृश्य वेगळे असते. पोलिसांनी कातडीने कारवाई केली असती आणि हे बॉम्बस्फोट रोखता आले असते. बॉम्बस्फोटाच्या कटामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांनाच अटक करता आलं असतं. पूर्ण कटाचा भंडाफोड झाला असता, असेही मत निकम यांनी व्यक्त केले आहे.

दहशतवादी हल्ला करणे हा संजय दत्तचा हेतू नव्हता

दरम्यान हा दावा करताना उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलंय की संजय दत्त बॉम्बस्फोट रोखू शकला असता. संजय दत्त हा दहशतवादी नव्हता. दहशतवादी हल्ला करणे हा संजय दत्तचा हेतू नव्हता, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?