AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती बाप्पांची परदेश वारी, कशासाठी जाताय बाप्पा विदेशात?

गणरायाच्या आगमनाला अद्याप सहा महिन्यांचा कालावधी आहे. परंतु मूर्तिकारांची तयारी सुरु झालीय. पुणे, मुंबई आणि कोकणातील मूर्तीकारांनी गणरायाच्या मुर्त्या बनवण्याचे काम सुरु केले आहे. या मूर्त्यांसाठी आता देशातूनच नाही तर विदेशातूनही मागणी येत आहे.

गणपती बाप्पांची परदेश वारी, कशासाठी जाताय बाप्पा विदेशात?
| Updated on: Mar 31, 2023 | 3:36 PM
Share

बदलापूर : गणेशोत्सवाला अद्याप ६ महिने बाकी असले, तरी मूर्तिकार मात्र आत्तापासूनच तयारीला लागलेत. पुणे आणि कोकणात त्याची जोरदार तयारी मूर्तीकारांनी सुरु केली आहे. आता बदलापुरातही गणरायाच्या मूर्त्या बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. बदलापूरच्या या मूर्त्यांना परदेशात असलेल्या भारतीयांनाकडूनही चांगली मागणी आहे. दरवर्षी कॅनडासह अमेरिका, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलियात बदलापूर येथील मूर्त्या जातात. यंदाही याला सुरुवात झाली आहे. बदलापूर शहरातून गणपती बाप्पा थेट कॅनडाला रवाना झाले आहेत. परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जातात.

चिंतामणी क्रिएशनचा पुढाकार

बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी ६ महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते.

यंदा सर्वात आधी कॅनडा देशात गणपती बाप्पा रवाना झाले आहेत. पहिल्या खेपेत कॅनडाच्या व्हॅनकुव्हर शहरात अडीच हजार बाप्पा रवाना झाले आहेत. जुलै महिन्याखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते, ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात. दरवर्षी कॅनडासह अमेरिका, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात. त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात.

अशी मिळाली संधी

निमेश जनवाड या तरुण उद्योजकाने मागील ६ वर्षांपासून गणेशमूर्ती निर्यात करायला सुरुवात केली. मसालाकिंग धनंजय दातार यांनी त्याला संधी दिली. २०१७ साली चिंतामणी क्रिएशन्स या व्यवसायाची सुरुवात केली. मग २०१८ साली ३ हजार आणि २०१९ साली साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या होत्या.

तर २०२० साली कोरोनामुळे निर्यात बंद झाल्यानं त्याला तब्बल ४० लाख रुपयांचा फटका बसला होता. त्यानंतर २०२१ साली त्याने मोठी झेप घेत २० हजार गणेशमूर्ती निर्यात केल्या होत्या, तर २०२२ साली त्याने ३५ हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवत नवीन विक्रम केला होता. यंदाच्या वर्षी त्याच्याही पुढे जात तब्बल ४५ ते ५० हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्याची तयारी केली आहे. त्यांनी पाठवलेल्या गणेशमूर्तींमुळे परदेशातल्या भारतीयांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.