गणपती बाप्पांची परदेश वारी, कशासाठी जाताय बाप्पा विदेशात?

गणरायाच्या आगमनाला अद्याप सहा महिन्यांचा कालावधी आहे. परंतु मूर्तिकारांची तयारी सुरु झालीय. पुणे, मुंबई आणि कोकणातील मूर्तीकारांनी गणरायाच्या मुर्त्या बनवण्याचे काम सुरु केले आहे. या मूर्त्यांसाठी आता देशातूनच नाही तर विदेशातूनही मागणी येत आहे.

गणपती बाप्पांची परदेश वारी, कशासाठी जाताय बाप्पा विदेशात?
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 3:36 PM

बदलापूर : गणेशोत्सवाला अद्याप ६ महिने बाकी असले, तरी मूर्तिकार मात्र आत्तापासूनच तयारीला लागलेत. पुणे आणि कोकणात त्याची जोरदार तयारी मूर्तीकारांनी सुरु केली आहे. आता बदलापुरातही गणरायाच्या मूर्त्या बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. बदलापूरच्या या मूर्त्यांना परदेशात असलेल्या भारतीयांनाकडूनही चांगली मागणी आहे. दरवर्षी कॅनडासह अमेरिका, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलियात बदलापूर येथील मूर्त्या जातात. यंदाही याला सुरुवात झाली आहे. बदलापूर शहरातून गणपती बाप्पा थेट कॅनडाला रवाना झाले आहेत. परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जातात.

चिंतामणी क्रिएशनचा पुढाकार

बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी ६ महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते.

हे सुद्धा वाचा

यंदा सर्वात आधी कॅनडा देशात गणपती बाप्पा रवाना झाले आहेत. पहिल्या खेपेत कॅनडाच्या व्हॅनकुव्हर शहरात अडीच हजार बाप्पा रवाना झाले आहेत. जुलै महिन्याखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते, ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात. दरवर्षी कॅनडासह अमेरिका, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात. त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात.

अशी मिळाली संधी

निमेश जनवाड या तरुण उद्योजकाने मागील ६ वर्षांपासून गणेशमूर्ती निर्यात करायला सुरुवात केली. मसालाकिंग धनंजय दातार यांनी त्याला संधी दिली. २०१७ साली चिंतामणी क्रिएशन्स या व्यवसायाची सुरुवात केली. मग २०१८ साली ३ हजार आणि २०१९ साली साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या होत्या.

तर २०२० साली कोरोनामुळे निर्यात बंद झाल्यानं त्याला तब्बल ४० लाख रुपयांचा फटका बसला होता. त्यानंतर २०२१ साली त्याने मोठी झेप घेत २० हजार गणेशमूर्ती निर्यात केल्या होत्या, तर २०२२ साली त्याने ३५ हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवत नवीन विक्रम केला होता. यंदाच्या वर्षी त्याच्याही पुढे जात तब्बल ४५ ते ५० हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्याची तयारी केली आहे. त्यांनी पाठवलेल्या गणेशमूर्तींमुळे परदेशातल्या भारतीयांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.