AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत ठाकरे गट किती जागा लढवणार?, आकडा आला समोर; शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार?

Sanjay Rau talk on Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. इंडिया आघाडी भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी आपली सर्व ताकद लावेल. सत्ता वाटपाबाबत बोलताना ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी आपला आकडा जाहीर केला आहे.

Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत ठाकरे गट किती जागा लढवणार?, आकडा आला समोर; शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार?
sanjay-raut-cm-eknath-shinde
| Updated on: Dec 22, 2023 | 8:03 PM
Share

मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे इंडिया आघाडीचं नेतृत्त्व करत आहेत. इंडिया आघाडीसमोर जागा वाटपाचं मोठं आव्हान असणार आहे.  अशातच ठाकरे गट महाराष्ट्रातील किती लोकसभा जागांवर निवडणूक लढणार आहे? याबाबत ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ संजय राऊत यांनी थेट आकडाच जाहीर केला आहे.

इतक्या जागांवर ठाकरे गट लढणार लोकसभेची निवडणूक?

उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी ,खर्गे आम्ही एकत्र बसून चर्चा केली आहे. त्या चर्चेत काय घडलं ते लाच माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीत त्याची चर्चा होईल, आम्ही 23 जागा लढू. प्रकाश आंबेडकर यांची देखील चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे ,ते महाविकास आघाडी इंडिया आलायन्स मध्ये असावेत,साअसं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना राऊतांनी अयोध्येतील राराम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरूनही निशाणा साधला आहे.

शिवसेनेला निमंत्रण नाही, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्यांनी निमंत्रण दिलं नसतं. कारण हे श्रेय घेण्याचं राजकीय चढाईचा भाग बनला आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळा आयोध्या मध्ये राम मंदिर बनना शिवसेनेचे मोठं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे देखील योगदान मोठ आहे. आम्हाला ते बोलणार नाही उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जयजयकार होईल. ज्यांचे योगदान आहे त्यांना सन्मानाने कधीच बोलणार नाही. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याची जहागीर नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील जागावाटप कशा प्रकारे होतं हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभेच्या 48 जागांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.