AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर ठाकरे गट, काँग्रेस, वंचित नवी आघाडी? ,राज्यात दिसणार नवं राजकीय समीकरण?

मला एकट्यालाच भाजपविरोधात लढावं लागेल, असं उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांना बोलल्याचं समजतंय. मात्र जर वेळ आलीच तर, ठाकरे गट-काँग्रेस आणि वंचित एकत्र लढू शकतात.

...तर ठाकरे गट, काँग्रेस, वंचित नवी आघाडी? ,राज्यात दिसणार नवं राजकीय समीकरण?
| Updated on: Apr 18, 2023 | 11:42 PM
Share

मुंबई : मला एकट्यालाच भाजपविरोधात लढावं लागेल, असं उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांना बोलल्याचं समजतंय. मात्र जर वेळ आलीच तर, ठाकरे गट-काँग्रेस आणि वंचित एकत्र लढू शकतात.

भाजपसोबत जाण्यासंदर्भात कोणताही प्लॅन नाही? निव्वळ अफवा आहेत हे अजित पवारांनी स्पष्ट केलं. मात्र या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य फार महत्वाचं आहे. मला एकट्यालाच भाजपसोबत लढावं लागेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांकडे केल्याची माहिती आहे..ज्याचा उल्लेख अजित पवारांनीही आपल्या पत्रकार परिषदेत केला पण राष्ट्रवादीत काही घडलंच तर, ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊन लढू शकतात.

सोमवारीच त्याची झलक मातोश्रीवर दिसली. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली..या भेटीत विचारधारा वेगवेगळी असली आणि काही मुद्यांवर मतभेद असले तरी, एकत्र लढण्यावर एकमत झालंय..आणि उद्धव ठाकरेंना दिल्लीत येण्याचंही निमंत्रण देण्यात आलं असून ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटल्यानंतर राहुल गांधी मुंबईत येणार आहेत.

ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे..तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसोबत ठाकरे गटाची वेगळी युती आहे..पण वंचित महाविकास आघाडीत समाविष्ट झालेली नाही..त्याचं कारण आहे प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीला विरोध, त्यामुळं समजा राष्ट्रवादी किंवा अजित पवारांचा गट वेगळा झालाच तर वंचित आणि काँग्रेस ठाकरेंना साथ देऊ शकतात.

वेळ आल्यास भाजपविरोधी कोणाशीही एकत्र येऊन सोबत लढू असं पटोले म्हणतायत..अर्थात राजकारण समीकरण कधीही जुळतं आणि कधीही बिघडतं. त्यामुळं तूर्तास वेट अँड वॉच.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.