AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबादास दानवे यांना निलंबित करताच उद्धव ठाकरे संतापले, विरोधी पक्षनेत्यांविरोधात षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप

"एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं. त्याचा निर्णय घेणं अपेक्षित असतं. निलंबन करण्याचा अधिकार हा अध्यक्ष किंवा सभापतींचा असतो. पण त्यासाठी एकतर्फी निर्णय, एका कुणाकडून मागणी झाली, म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अंबादास दानवे यांना निलंबित करताच उद्धव ठाकरे संतापले, विरोधी पक्षनेत्यांविरोधात षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांचा फोटो
| Updated on: Jul 02, 2024 | 3:17 PM
Share

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. विधान परिषदेच्या सभापतींनी घेतलेल्या या निर्णयावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवन परिसरात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अतिशय तिखट शब्दांत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना एक षडयंत्र रचत निलंबित करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. “खरंतर अंबादास दानवे यांना भूमिका मांडण्यासाठी संधी द्यायला हवी होती. त्यांना वेळ द्यायला हवी होती पण वेळ देण्यात आली नाही. आम्हाला कुणाला बोलू दिलं गेलं नाही. जणू काही सर्व ठरवूनच षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलं आहे, हे असं कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झाला असेल. हा सर्व अन्याय महाराष्ट्राची जनता डोळे उघडून पाहते आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

“आपल्याला कल्पना आहे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित केलं गेलं आहे. खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर, माझ्या बाजूला दोन्ही विधीमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं. त्याचा निर्णय घेणं अपेक्षित असतं. निलंबन करण्याचा अधिकार हा अध्यक्ष किंवा सभापतींचा असतो. पण त्यासाठी एकतर्फी निर्णय, एका कुणाकडून मागणी झाली, म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे, हा लोकशाहीच्या विरोधातील निर्णय आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

“आमचा काल शिक्षक-पदवीधर निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे, तो विजय झाकाळून टाकण्यासाठी त्यांनी निलंबनाचा निर्णय घेतला. म्हणजे आमच्या विजयाच्या बातम्या दाबून टाकण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसंच जो बोगस अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे, त्याची चिरफाड व्हायला आता सुरुवात झाली आहे. लोकांना सुद्धा कळलं आहे की, ही धूळफेक आहे. निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं हे गाजर आहे. त्याची चिरफाड करायला अनेक तज्ज्ञांनी आणि आम्ही सुरुवात केल्यानंतर कुठेतरी चर्चेला एका वेगळ्या मुद्द्याकडे न्यायचं असा प्रयत्न सुरु आहे. म्हणून आकसाने विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलं गेलं आहे. याचा आम्ही निषेध करतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“संपूर्ण जनेतेने हे पाहावं, तुमचा आवाज मांडताना विरोधी पक्षाला निलंबित केलं जात असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय? वातावरण खूप वाईट आहे. या निमित्ताने मी परत एकदा सांगतो, येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही एकत्र एका ताकदीने लढवू”, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.