Special Report : पंतप्रधान मोदी यांच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक वार, कोण काय म्हणाले?

| Updated on: Jan 19, 2023 | 9:52 PM

दरवर्षी लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता. खड्ड्यांचे बळी दरवर्षी जात होते. खड्ड्यात जाणारा मुंबईकरांचा पैसा वाचविण्याचं काम आम्ही करणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

Special Report : पंतप्रधान मोदी यांच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक वार, कोण काय म्हणाले?
Follow us on

मुंबई : मुंबईतील बीकेसी मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मोठी सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडलेत. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बेईमानी केल्याची टीका केली. तर, एकनाथ शिंदे यांनी आम्ही मोदी यांचेह आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांना डिवचलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची शाब्दिक तोफ ठाकरे यांच्यावर धडाडली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमच्यावर विश्वास ठेऊन महाराष्ट्रातील जनतेने डबल इंजिनची सरकार आणली. पण, काही लोकांनी बेईमानी केली. म्हणून अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार बनू शकली नाही. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी हिंमती केली. मोदीची तुमच्या नेतृत्वात लोकांच्या मनातील सरकार आलं.

25 वर्षांत मुंबईकरांना शुद्ध पाणी नाही

मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. पण, गेल्या २५ वर्षांत त्यांनी घरचं भरलं अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आतापर्यंत मुंबईत सत्ता असणाऱ्यांनी फिक्स डिपॉझीट केलेत. स्वतःची घरं भरली. पण, मुंबईकरांना शुद्ध पाणी देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.

खड्ड्यात जाणारा पैसा वाचविणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सिमेंटच्या रस्त्यावरून उद्धव ठाकरे यांना घेरलं. काँक्रिटच्या रस्त्यावरून टीका केली जात आहे. याला खोडा घालण्याचं काम काही लोकं करतात. दरवर्षी लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता. खड्ड्यांचे बळी दरवर्षी जात होते. खड्ड्यात जाणारा मुंबईकरांचा पैसा वाचविण्याचं काम आम्ही करणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

याचा काही जणांना त्रास होतोय

डांबरीकरणाच्या नावाखाली काळं पांढरं करणाऱ्यांची दुकानं सिमेंटच्या रस्त्यामुळं बंद होतील. यामुळं काही जणांची पोटदुखी उठली आहे. मळमळ सुरू झाली आहे. पायाखालची वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरली आहे. सहा महिन्यांत यवढं काम झालं मग, दोन वर्षात किती होईल, याचा सर्वांना त्रास होत असल्याचंही शिंदे यांनी सुनावलं.