भारत बंदमुळे आज भाज्यांचे दर कडाडले, वाचा आजचे ताजे भाव

| Updated on: Dec 09, 2020 | 9:05 AM

मिळालेल्या माहितीनुसार, भारत बंदचा फटका आता भाज्यांना बसला आहे. यामुळे आज अनेक मोठ्या मार्केटमध्ये भाज्यांचे भाव कडाडले आहेत.

भारत बंदमुळे आज भाज्यांचे दर कडाडले, वाचा आजचे ताजे भाव
भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
Follow us on

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही कडकडीत बंद पुकारण्यात आल्याचं पाहायला मुळावं. अनेक बाजार समित्या आणि व्यवसाय, वाहतूक ठप्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत बंदचा फटका आता भाज्यांना बसला आहे. यामुळे आज अनेक मोठ्या मार्केटमध्ये भाज्यांचे भाव कडाडले आहेत. (yesterdays bharat bandh impact on vegetables rate prices of vegetables have gone up)

अधिक माहितीनुसार, कालच्या बंदमुळे भाज्यांचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे भाज्या विकत घेताना आता नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. खरंतर, कालच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या अनेक बाजार समित्या बंद होत्या. यामुळे आज भाज्यांचे दर कडाडले आहेत.

खरंतर, कालच्या बंदच्या दिवशी कणकवलीत भाजपकडून अल्प दरात कांदे विक्री करण्यात आली. यामुळे ग्राहकांची कांदे खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. सिंधुदुर्गात सध्या कांद्याचे दर 45 रुपये किलो असताना भाजपकडून 30 रुपये दराने विक्री करण्यात आली. खासदार नारायण राणेंच्या सहकार्याने ही विक्री केल्याची माहिती समोर आली होती.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट सहभागी झाले होते. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. एपीएमसी मधीलपाचही बाजारपेठा पूर्ण बंद ठेवण्यात आल्या होत्या. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून आला. यामुळे आज भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

भाज्यांचे आजचे दर

– टोमॅटो- आधी 30, आता 40 रुपये किलो

– फरस बी – आधी 50, आता 80

– काकडी – आधी 20 रुपये किलो, आता 40 रुपये किलो

– दुधी – आधी 8 रुपये किलो, आता 20 रुपये किलो

– वांगी – आधी 13, आता 30 रुपये किलो

– हिरवा वाटाणा – आधी 40, आता 60 रुपये किलो

– गवार – आधी 300 रुपये किलो, आता 400

– कारली – आधी 16, आता 24 रुपये किलो (yesterdays bharat bandh impact on vegetables rate prices of vegetables have gone up)

इतर बातम्या – 

FARMER PROTEST | शेतकरी आंदोलक आणि सरकारमधील आजची बैठक रद्

Bharat Bandh | नागपुरात कळमना भाजीबाजारात भाज्यांची आवक निम्म्याने घटली

(yesterdays bharat bandh impact on vegetables rate prices of vegetables have gone up)