AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथे लोक अचानक होतात टकले, टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ लोकांना सर्वाधिक धोका

अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक नागिरकांचे केस गेले असून त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथे लोक अचानक होतात टकले, टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; 'या' लोकांना सर्वाधिक धोका
बुलढाण्यातील लोक अचानक टकले का झाले?
| Updated on: Jan 08, 2025 | 11:07 AM
Share

चीनमध्ये सध्या HMPV विषाणूने धूमाकूळ घातला असून भारतातही त्याचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारत सरकार तसेच महाराष्ट्रातही प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. मात्र HMPV ची भीती सतावत असताना राज्यातील बुलढाणा, शेगांव येथे मात्र एका अज्ञात व्हायरसने धूमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसांत चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. शेगांव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून, कुटुंब ची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण परसले आहे.

टक्कल व्हायरसचा धुमाकूळ

मिळालेल्या माहितीनुसार, शेगावच्या अनेक गावांत सध्या टक्कल व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. येथे या अज्ञात व्हायरसमुळे अनेक लोकांना केस गमवावे लागत आहेत. आधी डोक्याला खाज सुटते, नंतर केस गळून सरळ हातात येतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडते, यामुळेच नागिरक घाबरले आहेत. विशेष म्हणजे शेगावजवळील अनेक गावांत हा व्हायरस पसला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गेले आहेत, त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

मात्र गावात सध्या एवढा भयानक प्रकार घडूनही प्रशासन मात्र या घटनेपासून अजूनही अनभिज्ञ आहे , त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. केसगळती आणि टक्कलच्या या समस्येपासून वाचण्यासाठी अनेक नागरिक हे खाजगी रुग्णालयात धाव घेऊन उपचारही घेत आहेत.

कशामुळे पडतंय टक्कल ?

मात्र अनेक गावातील नागरिकांना टक्कल पडण्याची ही समस्या भेडसावत असून स्त्रियाही त्यातून वाचू शकलेल्या नाहीत. पण हा प्रकार नेमका का घडतोय हो अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. शांपू वापरल्यामुळे हा प्रकार घडून केसगळती आणि टक्कल पडत असावे असं डॉक्टरांचं मत आहे. पण ज्यांनी आयुष्यात कधीच शांपू वापरलेला नाहीये, त्याला हातही लावला नाही त्या लोकांचे केस जात असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे .

पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले

गेल्या तीन दिवसांपासून गावातील काही लोकांमध्ये अचानक केसगळती सुरू झाली. आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कटोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 असे केसगळतीचे रुग्ण आढळून आले. ते नागरिक जे पाणी वापरत होते, त्याचा नमुना आम्ही तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि सदर रुग्णांवर प्राथमिक उपचार केले आहेत, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यातर्फे सांगण्यात आलं.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये उपचार शिबिर राबवण्याचे आवाहन केले आहे. या गावामधे आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाय योजना केली नव्हती.कालवड, बोंडगाव व हिंगणा या गावामधे केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत असून आपोआप टक्कल पडत आहेत याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गीते यांना निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे.

झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचे आंदोलन
झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचे आंदोलन.
भाजप पक्ष नाही, छळ छावणी! त्याचे बळी दादा; संजय राऊतांची विखारी टीका
भाजप पक्ष नाही, छळ छावणी! त्याचे बळी दादा; संजय राऊतांची विखारी टीका.
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल.
अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान
अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान.
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल.
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना.
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू.
भाजपकडे हिंदू-मुस्लिमशिवाय कोणताही विचार नाही, संजय राऊतांचा घणाघात
भाजपकडे हिंदू-मुस्लिमशिवाय कोणताही विचार नाही, संजय राऊतांचा घणाघात.
दुश्मन न करे दोस्त ने वो...! दादांच्या आठवणीनं जयंत पाटील भावूक
दुश्मन न करे दोस्त ने वो...! दादांच्या आठवणीनं जयंत पाटील भावूक.
काळंबेरं झाल्यास सरकार अडचणीत! रोहित पवारांचा पुन्हा इशारा
काळंबेरं झाल्यास सरकार अडचणीत! रोहित पवारांचा पुन्हा इशारा.