AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर MIDC मध्ये मोठा अपघात, पाण्याची टाकी फुटल्याने 3 कामगारांचा मृत्यू, 8 जण जखमी

Nagpur News : नागपूरमधील बुटीबोरी एमआयडीसी फेज 2 मधील अवाडा सोलर प्लांटमधील एक मोठी पाण्याची टाकी अचानक फुटली आहे. या घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.

नागपूर MIDC मध्ये मोठा अपघात, पाण्याची टाकी फुटल्याने 3 कामगारांचा मृत्यू, 8 जण जखमी
Nagpur AccidentImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 19, 2025 | 3:42 PM
Share

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये आज सकाळी मोठा अपघात झाला आहे. नवीन बुटीबोरी एमआयडीसी फेज 2 मधील अवाडा सोलर प्लांटमधील एक मोठी पाण्याची टाकी अचानक फुटली आहे. पाण्याच्या दबावामुळे ही टाकी फुटल्याचे समोर आले आहे. टाकी फुटल्यानंतर अनेक कामगार टाकीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. यात बऱ्याच कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र या घटनेत 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून आठ पेक्षा जास्त जण झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

3 जणांचा मृत्यू

बुटीबोरी एमआयडीसी फेज 2 मधील अवडा सोलर प्लांटमध्ये ही टाकी फुटल्याची घटना घडली आहे. टाकी फुटल्यानंतर मोठा आवाज झाला आणि या टाकीच्या ढिगाऱ्यात अनेक कामगार अडकले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले. मात्र या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हा अपघात कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे आजूबाजूच्या औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आता कामगारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. या घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

ही घटना घडली तेव्हा या ठिकाणी मोठ्या संख्येने कामगार काम करत होते. त्यामुळे आणखी काही कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याचा संशय आहे. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे आणि अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सध्या प्रशासनाने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. तसेच जनतेला अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्या जाणाऱ्या जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी सज्ज आहेत अशी माहिती समोर आली आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.