AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल भाजप होती, आज काँग्रेस, तर उद्या कुणीतरी; अमृता फडणवीस म्हणतात, कर्नाटकसाठी चांगली गोष्ट

मदर्स डे हा खूपच सुंदर असा दिवस आहे. जिच्या हात पाळण्याची दोरी ती जग तारी असे म्हणतात. मला असं वाटतं,आईचं आहे जी पुढचं भविष्य घडवते.

काल भाजप होती, आज काँग्रेस, तर उद्या कुणीतरी; अमृता फडणवीस म्हणतात, कर्नाटकसाठी चांगली गोष्ट
| Updated on: May 13, 2023 | 9:18 PM
Share

सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. सत्तेत असूनही भाजपला आता विरोधात बसावं लागणार आहे. १९८५ पासून कर्नाटकची जनता आलटून-पालटून निवडून देते. कर्नाटक निवडणुकीवर अनेकांना भाष्य केलंय. या प्रतिक्रियांमध्ये भर पडली ती समाजसेविका अमृता देवेंद्र फडणवीस यांची. अमृता फडणवीस म्हणाल्या, मला पॉलिटिकल बोलायचं नाहीय. राजकीय बोलायचं नाहीय. पण ही चांगली गोष्ट आहे. हेल्दी गोष्ट आहे. प्रत्येक पार्टीला कर्नाटकची जनता संधी देत आहे. काल आम्ही होतो. आज काँग्रेस आहे. उद्या अजून कोणी राहील. कर्नाटकसाठी चांगली गोष्टी आहे. काही इश्यू नाही.

AMRUTA fadanvis 2 n

लोकसभेत मोदीच जिंकतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक निवडणुकीत जाऊनही भाजपला पराभव स्वीकारावा लागला. यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. लोकसभेशी या निवडणुकीचा काही संबंध नाही. लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदी हेच निवडणूक जिंकतील. याचा सर्वांना विश्वास असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

मदर्स डेच्या शुभेच्छा

उद्या मदर्स डे आहे. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मदर्स डे हा खूपच सुंदर असा दिवस आहे. जिच्या हात पाळण्याची दोरी ती जग तारी असे म्हणतात. मला असं वाटतं,आईचं आहे जी पुढचं भविष्य घडवते. कर्तुत्ववान आईला माझ्याकडून आणि सर्वांकडून सलाम.

अमृता फडणवीस या मोजक्या बोलतात. पण, त्या अर्थपूर्ण बोलतात. त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली जाते. कर्नाटक निवडणूक निकालाबाबत बोलायचं नसलं, तरी त्या थोडक्यात बोलल्या. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असल्याचं सांगितलं. त्यानंतर मदर्स डे निमित्त त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.