AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Helpline | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर, फोन करून समुपदेशन करा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने समुपदेशक नियुक्त केले आहेत. नागपूर विभागीय मंडळात चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे.

Nagpur Helpline | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर, फोन करून समुपदेशन करा
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Feb 10, 2022 | 4:50 AM
Share

नागपूर : दहावी आणि बारावीत विद्यार्थी गेले की, मनात एक दडपण असते. बोर्डाची परीक्षा कशी द्यावी, असा विचार मनात येतो. ही भीती दूर घालविण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने (Nagpur Divisional Board of Education) पुढाकार घेतला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यासाठी चार समुपदेशकांची नियुक्ती (Appointment of four counselors) करण्यात आली आहे. परीक्षेसंदर्भात माहिती देण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुरू केले आहे. या हेल्पलाईनवर विद्यार्थी आपल्या समस्या सांगू शकतात. त्यांच्या समस्यांवर समुपदेशक (Counselor) योग्य मार्गदर्शन करतील. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना काय करावे हे कधी-कधी समजत नाही. अशावेळी तुमच्या मदतीला हे समुपदेशक कामास येतील. त्यामुळं मनात कोणत्याही प्रकारची भीती न ठेवता. तुमच्या मनातील प्रश्न समुपदेशकांना विचारावे. विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे. या संधीचे सोने करावे.

किती विद्यार्थी देणार परीक्षा?

भंडारा जिल्ह्यात 17 हजार 20 विद्यार्थी दहावीची, तर 18 हजार 107 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नागपूर शहरात 33 हजार 498 विद्यार्थी दहावीची, तर 37 हजार 805 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. तर नागपूर ग्रामीणमध्ये 27 हजार 590 विद्यार्थी दहावीची, तर 26 हजार 584 बारावीचे विद्यार्थी परीक्षा देणार आहे. याशिवाय चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातही विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी सातदरम्यान करा तक्रार

राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी व त्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून नावे मागितली. त्यापैकी चार अधिकाऱ्यांना समुपदेशनासाठी नियुक्त करण्यात आले आहे. चार फेब्रुवारीपासून ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सात दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात काही अडचणी असतील तर खालील क्रमांकावर संपर्क करावा. संबंधित अधिकारी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतात. 0712-2565403 या लँडलाईनवर संपर्क साधता येईल. श्रीराम चव्हाण (9822695372), ए. एन. कन्नमवार (9623456828), जी. व्ही. आडे (9420719049) तसेच जे. के. बांते (9423703092) यांच्याशी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजतादरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spices Price | मिरचीसह मसाल्यांना महागाईचा ठसका, खसखस व लवंगला सोन्याचा भाव…

Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यात आज फेरफार अदालत; कुठे करता येणार शेती-मालमत्तेची फेरफार?

मॅनेजर बायकोच्या चारित्र्यावर संशय, खुनाच्या इराद्याने ऑफिस गाठलं, चाकू हल्ल्यात बॉस गंभीर

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.