AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dr. Rani Bang | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांची प्रकृती गंभीर, ‘या’ हॉस्पिटलला ICU मध्ये उपचार

गडचिरोली जिल्ह्यात सर्च संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात डॉक्टर राणी बंग यांचं मोठं योगदान आहे.

Dr. Rani Bang | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांची प्रकृती गंभीर, 'या' हॉस्पिटलला ICU मध्ये उपचार
Image Credit source: social media
| Updated on: Nov 16, 2022 | 3:56 PM
Share

मोहम्मद इरफान, नागपूरः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग (Dr. Rani Bang) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हाती आली आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील समाजसेवक डॉक्टर अभय बंग (Abhay Bang) यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. मेंदूच्या आजाराने ग्रस्त असल्याने राणी बंग यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत. नागपूर येथील सिम्स रुग्णालयात (SIMS hospital) ICU मध्ये डॉ. राणी बंग अॅडमिट आहेत. मात्र प्रकृती अधिक गंभीर होत चालल्याने त्यांना तत्काळ मुंबई येथील रिलायन्स रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सर्च संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात डॉक्टर राणी बंग यांचं मोठं योगदान आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीसाठी डॉक्टर अभय बंग व राणी बग यांनी अखंड प्रयत्न केले.

डॉ. राणी बंग यांचे लग्नापूर्वीचे नाव डॉ. राणी चारी असे होते. त्या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या रहिवासी. त्यांचे वडिलही डॉक्टर होते. एमबीबीएस झाल्यानंतर डॉ. राणी यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्याशी विवाह केला.

स्त्रीरोग शास्त्र या विषय़ात डॉ. राणी बंग यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ या विषयात त्यांनी पदवीही मिळवली.

डॉ. अभय बंग यांच्यासोबत जोडल्या गेल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी स्त्रियांच्या आरोग्यावर मोठं काम केलं. या स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या आणि भावविश्वाचा आढावा घेणारी दोन पुस्तकं त्यांनी लिहिलं. कानोसा आणि गोईण अशी ही दोन पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा डीलिट, 2003 सालचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर 2018 सालचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.