AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mali Samaj | माळी समाजाचे राज्यात महासंपर्क अभियान, स्थानिक स्वराज्य संस्थांत समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे; अविनाश ठाकरेंचा पुनरुच्चार

माळी समाजाच्या प्रश्नांवर अभ्यासगट स्थापन करणार आहेत. समाजाच्या विकासासाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केले जाणार असल्याचं अविनाश ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले, माळी समाज हा ओबीसीमधला सर्वात मोठा घटक आहे. राजकीय आरक्षण स्थगित झाला आहे. माळी समाजाला फटका बसला आहे.

Mali Samaj | माळी समाजाचे राज्यात महासंपर्क अभियान, स्थानिक स्वराज्य संस्थांत समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे; अविनाश ठाकरेंचा पुनरुच्चार
माळी समाजाचे राज्यात महासंपर्क अभियानImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 12:11 PM
Share

नागपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झालं. ओबीसींमधील मोठा घटक असलेल्या माळी समाजाने आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी महासंपर्क अभियानाला उपराजधानी नागपुरातून सुरुवात केलीय. समता संस्कृतिक भवनात (Samata Sanskritik Bhavan) माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे (National President Avinash Thackeray) यांच्या नेतृत्वात मेळावा घेण्यात आला. समाजातील प्रश्न आणि त्यावर सोडण्यासाठी चर्चा करण्यात आली. ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाजाला लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व मिळावे, हा मुख्य उद्देश या महासंपर्क अभियानाचे असणार आहे. यात पुढील 15 दिवस राज्यातील सर्वच जिल्ह्यात-जिल्ह्यात महासंपर्क अभियान (Mahasampark Abhiyan) राबवण्यात येणार आहे. पुढील 15 दिवस माळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाणार आहे. या माध्यमातून 1 लाख समाजातील कुटुंबातील लोकांशी संपर्क करून त्याचे प्रश्न जाणून घेतले जातील.

विकासाचे व्हिजन डाक्युमेंट तयार करणार

माळी समाजाच्या प्रश्नांवर अभ्यासगट स्थापन करणार आहेत. समाजाच्या विकासासाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केले जाणार असल्याचं अविनाश ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले, माळी समाज हा ओबीसीमधला सर्वात मोठा घटक आहे. राजकीय आरक्षण स्थगित झाला आहे. माळी समाजाला फटका बसला आहे. सरकारमधील सरंजामशाही गटाला आरक्षण नको. माळी समाजाचे राजकीय मागासलेपण आहे. शेतीचे प्रश्न आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आहे. जनजागृती करणे आवश्यक आहे.

संघटना कोणत्याही पक्षाशी बांधील नाही

अविनाश ठाकरे म्हणाले, राजकीय संधी निघून जात आहे. याची माळी समाजबांधवांना जाणीव करून दिली जात आहे. यासाठी महाराष्ट्राचा दौरा आखतो आहे. माळी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय नेतृत्व मिळालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व मिळावं. पुण्याला वाचनालय व्हावं, या माध्यमातून उजळणी होईल. भाजपचा पदाधिकारी असलो, तरी माळी महासंघ ही संघटना आहे. ही संघटना कोणत्याही पक्षासी संबंधित नाही. समता परिषदेला कोण नेतृत्व करतात, याची तुम्हाला माहिती आहे. याचा अर्थ असा नाही की माळी महासंघ कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील राहील, असंही अविनाश ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....