AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane: राणेंमागे पुन्हा शुक्लकाष्ठ; राज्याचे महसूलमंत्री असतानाच्या व्यवहाराची होणार चौकशी, प्रकरण काय?

केंद्रीय मंत्री नारायण राणे कुटुंबाच्या महाराष्ट्र, गोवा आणि लंडनमधील संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी राज्याच्या एन्टीकरप्शन ब्युरोकडे केलीय. तसेच राज्याच्या लोकायुक्तांकडेही तक्रार याचिका दाखल केल्या आहेत. अखेर या प्रकरणी ठाणे येथील महाराष्ट्र राज्य एन्टीकरप्शन ब्युरो कार्यालयातून राणे प्रकरणाची चौकशी आदेश दिले आहेत.

Narayan Rane: राणेंमागे पुन्हा शुक्लकाष्ठ; राज्याचे महसूलमंत्री असतानाच्या व्यवहाराची होणार चौकशी, प्रकरण काय?
नारायण राणे, केंद्रीय मंत्री.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 17, 2022 | 3:15 PM
Share

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे (Shivsena) नाते आता विळाभोपळ्याचे झाले आहे. दोघांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आता पुन्हा एकदा धारधार होताना दिसतायत. त्यामुळेच नारायण राणे (Narayan Rane) हे राज्याचे महसूल मंत्री असताना झालेल्या एका व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश ठाण्यातील एन्टीकरप्शन ब्युरोने (Anti-Corruption Bureau) दिले आहेत. या प्रकरणाची महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यात या व्यवहारात गैरव्यवहार झाला असून, ही जमीन कवडीमोल भावाने विकल्याचे म्हटले होते. याप्रकरणी संपूर्ण कुटुंबाची चौकशी करावी. बेहिशेबी मालमत्ता सीज करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी होती. या मागणीचा विचार करून ही चौकशी होणार असल्याचे समजते. जाणून घेऊयात हे नेमके प्रकरण काय आणि कसे घडले आहे ते.

नेमके प्रकरण काय?

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालकेर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात पोलिसांकडे एक तक्रार दिलीय. त्यात म्हटले आहे की, नारायण राणे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना शासनाने एक व्यवहार केला होता. त्यात राज्य शासनाच्या जमिनीवर एक प्रीमियर कंपनी होती. तिच्या 186 कोटींचा बोजा होता. याच कंपनीची 86 एकरची जमीन अवघ्या 12 कोटी रुपयांना अनंत डेव्हलपर्स बिल्डर विकण्यात आली. विशेष म्हणजे खोटा जीआर करून ही जमीन विकली आहे, असा आरोप राणे यांच्यावर करण्यात आला आहे.

पुढे काय होणार?

नारायण राणे यांनी डोंबिवलीमधील अनेक शेतकरी, राज्य सरकारच्या जमिनी अनंत डेव्हलपर्स या बिल्डरला विकल्या. त्यामुळे या व्यवहाराप्रकरणी राणे कुटुंबाच्या महाराष्ट्र, गोवा आणि लंडनमधील संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी राज्याच्या एन्टीकरप्शन ब्युरोकडे केलीय. तसेच राज्याच्या लोकायुक्तांकडेही तक्रार याचिका दाखल केल्या आहेत. अखेर या प्रकरणी ठाणे येथील महाराष्ट्र राज्य एन्टीकरप्शन ब्युरो कार्यालयातून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता राणे यांच्यावर काय कारवाई होणार, हे पाहावे लागेल. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीसमोर राणे यांच्यासमोरच्या अडचणी वाढताना दिसतायत.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार