AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन

Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर… जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन

| Updated on: Sep 12, 2026 | 1:45 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या निर्णायक आंदोलनाची सविस्तर रणनीती स्पष्ट केली आहे. त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करत, अडथळे आल्यास संयमाने सामोरे जाण्याचे आणि पर्यायी मार्ग शोधण्याचे निर्देश दिले. फडणवीस सरकार मराठा मतदारांचा रोष ओढवून घेणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे निघणाऱ्या महामोर्चाचा सविस्तर मार्ग आणि मुक्कामाचे नियोजन जाहीर केले आहे. प्रचंड जनसमुदाय मुंबईत दाखल होणार असल्याने, एका दिवसात पोहोचणे शक्य नाही हे लक्षात घेऊन, जरांगे पाटलांनी मराठा बांधवांच्या सोयीसाठी आणि स्थानिक प्रशासनावर ताण येऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे.

या नियोजनानुसार, मराठा मोर्चा बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून सुरू होईल, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे दुसरा मुक्काम पडेल. पुणे जिल्ह्यातील हडपसर तिसऱ्या मुक्कामाचे ठिकाण असून, रायगड जिल्ह्यातील खोपोली (किंवा कोपरखैरणे) येथे चौथा मुक्काम असणार आहे. एकूण चार मुक्काम करून पाचव्या दिवशी हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचेल, जिथे आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. जरांगे पाटलांनी सांगितले की, समाजाच्या हितासाठी आणि लेकरांच्या भविष्यासाठी ही लढाई आहे. या मार्गावरील मराठा बांधवांना त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी आणि वाट लावण्यासाठीकुटुंबासह येण्याचे आवाहन केले आहे.

 

 

Published on: Sep 12, 2026 01:45 PM

Follow Us