AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

cabinet expansion : मोदी मंत्रिमंडळात शिंदे गटातून दोघांना संधी, शिंदे गटातील नेत्याचा दावा

cabinet expansion : राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. या विस्तारासंदर्भात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. आता शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. मोदी मंत्रिमंडळात दोघांना संधी मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.

cabinet expansion : मोदी मंत्रिमंडळात शिंदे गटातून दोघांना संधी, शिंदे गटातील नेत्याचा दावा
विविध विषयांवर चर्चा Image Credit source: tv9marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 14, 2023 | 12:13 PM
Share

दत्ता कानवटे, संभाजीनगर : राज्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालानंतर सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. आता राज्याच्या विस्तारासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासंदर्भात शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटातील दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचा निर्णय योग्य

टीव्ही ९ मराठी बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी झाला हा भाजपचा दावा बरोबर आहे. आम्हीसुद्धा शिवसेना भाजपचे सरकार येईल, या आनंदात होतो, पण अचानक बदल झाल्याने आपण भाजप सोबत जाणार नाही, असं कळले. मग त्यावेळी भाजपने जी खेळी केली, ती योग्य होती.

संजय राऊत यांच्यांवर टीका

कर्नाटकच्या निकालाचा काही परिणाम दुसऱ्या राज्यावर होणार नाही, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. त्यावेळी संजय राऊत यांना टोलाही मारला. ते म्हणाले, इतरांच्या आनंदात आनंद साजरा करण्यात यांना इंटरेस्ट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हे दिवस आले आहेत. उद्धव ठाकरे यांना इतकं लाचार संजय राऊत यांनी केलीय त्याची आम्हाला लाज वाटतेय.

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. राज्यात कोणाला मंत्री करावे, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ठरवतील. येत्या दहा दिवसांत हा विस्तार व्हावा, अशी मला अपेक्षा असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. यावेळी राज्य मंत्रिमंडळात २० जणांना संधी मिळणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाही दोन मंत्री शिवसेनेचे होतील, असे त्यांनी सांगितले.

बच्चू कडू यांनीही सांगितली होती तारीख

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या काही दिवसांपासून रखडला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. 18-19 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे फोन आमदार एकमेकांना करत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल आणि त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होईल, असं बच्चू कडू म्हणाले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नाही. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. या विस्तारात माझी वर्णी कधी लागणार की नाही, हे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द होता. ते आपला शब्द पाळतील,असे बच्चू कडू यांनी सांगितले होते.

Follow Us
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?