AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करारनामा नाही तर पाणीपुरवठा नाही!, जलसंपदा विभागाचं नाशिक महापालिकेला पत्र, दिवाळीनंतर विशेष बैठक

जलसंपदा विभागाकडून नाशिक महापालिकेशी पत्रव्यवहार सुरु असून, करारनाम्याची कारवाई पूर्ण करण्याची आठवण करुन देण्यात आली आहे. त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यास थेट पाणीपुरवठा बंद करण्याचा इशाराच देण्यात आल्यानं या दोन्ही संस्थांमधील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे

करारनामा नाही तर पाणीपुरवठा नाही!, जलसंपदा विभागाचं नाशिक महापालिकेला पत्र, दिवाळीनंतर विशेष बैठक
| Updated on: Nov 15, 2020 | 9:26 AM
Share

नाशिक: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह अन्य धरणातील पाणी उचलण्यासंदर्भात महापालिका आणि जलसंपदा विभागातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जलसंपदा विभागासोबत करारनामा करण्यासाठी महापालिकेची अनास्था दिसून येत असल्याचा आरोप जलसंपदा विभाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून महापालिकेशी पत्रव्यवहार सुरु असून, करारनाम्याची कारवाई पूर्ण करण्याची आठवण करुन देण्यात आली आहे. त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यास थेट पाणीपुरवठा बंद करण्याचा इशाराच देण्यात आल्यानं या दोन्ही संस्थांमधील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाची दिवाळीनंतर विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Meeting of Water Resources Department and Nashik Municipal Corporation after Diwali on the issue of water supply)

नाशिक शहराला गंगापूर, दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्या बदल्यात महापालिका जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी भरतं. याबाबत दोन्ही संस्थांमध्ये अद्याप करार मात्र झालेला नाही. दरम्यान, महापालिकेने करारासाठी 1.10 कोटी रुपये जलसंपदा विभागाकडे यापूर्वीच अदा केले आहेत. असं असताना महापालिकेककडून करार होत नसल्याने जलसंपदा विभागानं गेल्या 12 वर्षांपासून महापालिकेकडून पाणी वापराच्या सव्वापट दंड आकारला आहे.

पाणीपुरवठ्यासाठी पूर्वी 10 हजार लीटरला साधारण 2.10 रुपये दर होता. मात्र, लावलेल्या दंडानुसार 10 हजार लीटरला 2.60 रुपये दर लावण्यात आला आहे. त्यानुसार गंगापूर धरणातून उचललेल्या पाण्यासाठी 23.33 कोटी रुपये , तर दारणा धरण्यातील पाण्यापोटी 6 कोटी रुपयांचं बिल जलसंपदा विभागानं महापालिकेला पाठवलं.

जलसंपदा विभागाच्या पत्रात काय इशारा?

पाणीपट्टीबाबतचा वाद संपुष्टात येण्यासाठी एकेरी दराने असणारी थकीत पाणीपट्टी महापालिकेनं अद्या केल्यानंतर करारनामा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेला यापूर्वीही करारनामा करण्याबाबत कळवलं आहे. पण अद्याप करारनामा झालेलना नाही. यात महापालिकेची अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे थकबाकीही वाढत आहे. करारनामा करण्याबाबत वारंवार कळवूनही तो झाला नाही तर संस्थांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई जलसंपदा विभाग करु शकतं, असं पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला लिहिलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावर महापालिका आणि जलसंपदा विभागाची एक विशेष बैठक दिवाळीनंतर ठेवण्यात आली आहे. त्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

नाशिकमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करा, महापौरांचे अध्यक्षांना पत्र

उद्धव ठाकरेंचे एकत्र लढण्याचे संकेत, नाशिक मनपासाठी महाविकास आघाडीचा मेगाप्लॅन

Meeting of Water Resources Department and Nashik Municipal Corporation after Diwali on the issue of water supply

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.