नाशिक महापालिकेची प्रभाग रचना नव्याने; इच्छुकांच्या प्रचारावर अधिसूचनेचे पाणी!
नाशिक महाालिकेचे विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत आज 15 मार्च रोजी संपतेय. त्या पार्श्वभूमीवर 14 मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कामकाज हाती घेतले आहे. महापौर आणि उपमहापौरांनी महापालिकेची वाहन जमा केलीयत. महापौरांचे शासकीय निवासस्थानही आता प्रशासकांच्या अखत्यारित येणार आहे.
नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेची (municipal corporation) प्रभाग रचना नव्याने होणार असल्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत विशिष्ट वॉर्डातून आपल्यालाच तिकीट मिळणार, अशा अतिआत्मविश्वासात राहून धडाडीने प्रचार करणाऱ्या इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. राज्य सरकराने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या पेचामुळे राज्य निवडणूक (election) आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतलेत. त्यानुसार 12 मार्च रोजी राजपत्रात अधिशूचना प्रसिद्ध झाली. त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत ज्या प्रभागामध्ये विभागणी किंवा त्यांच्या हद्द निश्चितीची प्रक्रिया सुरू असेल अथवा पूर्ण केली असेल, तर ती आता रद्द झाल्याचे मानण्यात येणार आहे. त्यामुळे जाहीर झालेली प्रभाग रचना रद्द होणार आहे. शिवाय आक्षेपानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची आशाही मावळली आहे. मात्र, या प्रकरणात अनेक जण न्यायालयाचा दरवाजाही ठोठावू शकतात.
प्रशासक राज सुरू
महाालिकेचे विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत आज 15 मार्च रोजी संपतेय. त्या पार्श्वभूमीवर 14 मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कामकाज हाती घेतले आहे. महापौर आणि उपमहापौरांनी महापालिकेची वाहन जमा केलीयत. महापौरांचे शासकीय निवासस्थानही आता प्रशासकांच्या अखत्यारित येणार आहे.
सत्तेची चावी सरकारकडे
जिल्हा परिषदेतील कारभाऱ्यांचा कार्यकाळ 20 मार्च रोजी संपत आहे. येथेही प्रशासकीय राजवट लागू होणार असून, येथील प्रशासकीय सूत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हाती जाणार आहेत. प्रशासक राजवटीत महापालिकेत आयुक्त आणि जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढणार असल्याने सत्तेची खरी चावी महाविकास आघाडी सरकारडेच जाणार आहे.
निवडणूक दिवाळीत
महापालिकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलल्याचे सरकार म्हणत आहे. मात्र, या निवडणुका दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या सभेतही असाच अंदाज वर्तवला. जून-जुलै महिन्यात पावसाळा सुरू होईल. त्यामुळे त्या काळात निवडणुका होणार नाहीत. आता थेट दिवाळीची वाट पाहावी लागेल, असे राज म्हणाले. तसे झाले तर ज्यांनी सध्या प्रचार सुरू केलाय, त्यांना पुन्हा प्रचारासाठी जोर लावावा लागेल. त्यातही वॉर्डची बदलाबदली झाली, तर सध्याची तयारीही वाया जाईल, अशी चिन्हे आहेत.
इतर बातम्याः