AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर राजकारण करतो त्यांच्याशी…; नुकसान पाहणीनंतर मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना अश्वासन

सरकारविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, खात्रीने सांगतो की सरकारने गेल्या सहा महिन्यात भरपूर पैसे दिलेले आहेत. वेगवेगळा दिवशी गारपीठ आणि पाऊस झाल्याने पूर्ण पंचनामे करून पैसे कसे देता येतील त्याचे नियोजन सरकार करणार आहे.

ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर राजकारण करतो त्यांच्याशी...; नुकसान पाहणीनंतर मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना अश्वासन
| Edited By: | Updated on: Mar 21, 2023 | 11:34 PM
Share

नाशिक : अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागात प्रचंड नुकसान झाले आहे.त्यातच नाशिक जिल्ह्यालाही जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून निफाड तालुक्यातील शेतीचे सर्वात मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरीव मदत मिळण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नुकसान झाल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांनी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

17 तारखेला गारपीट झाल्यानंतर बियाणे खराब झाले होते.त्यामुळे बियाणे पुरवण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच जिल्हा बँका ठेवी देत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विविध गोष्टींबरोबरच अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

यावेळी त्यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी असाही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पीक विमा आणि अतिवृष्टीचे मागील पैसे मिळाले नाहीत अशी तक्रारही त्यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

यावेळी अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, अस्मानी संकट आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. द्राक्ष, कांदे, टरबूज आणि भाजीपाला पिकांची पाहणीही यावेळी करण्यात आली आहे.

अब्दुल सत्तार यांच्यावर पाहणी दौऱ्यावरून टीका करण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर राजकारण करतो त्यांच्याशी बेइमानी करणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले की, 2800 कोटी रुपये परतीच्या पावसाचे पैसे देणे आहेत. त्यामुळे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसान भरपाईची घोषणा मुख्यमंत्री करतील असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पंचनाम्यात एका गावाला मदत देता येत नसून राज्याच्या धोरणांचा विचार करावा लागतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

गारपीठ झालेल्या भागातील शेतकऱ्यांना बँकेच्या काय सवलती देण्यात येतील त्याची घोषणा विधान सभेत होणार असल्याचे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

सरकारविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, खात्रीने सांगतो की सरकारने गेल्या सहा महिन्यात भरपूर पैसे दिलेले आहेत. वेगवेगळा दिवशी गारपीठ आणि पाऊस झाल्याने पूर्ण पंचनामे करून पैसे कसे देता येतील त्याचे नियोजन सरकार करणार आहे.

त्यामुळे संकटात सरकार मदत देण्यात कमी पडणार नाही असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. सरकारकडून आता कर्जमाफी होणार नसून त्या पेक्षा वेगळा काय निर्णय घेता येतील तो विचार करायचा आहे अशा शब्दात त्यांनी कर्जमाफीवर बोलताना सांगितले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.