महाराष्ट्रातील काँग्रेस युवकांना संधी देत नाही; ‘पदवीधर’वरून राजकारणाचा स्तरच ‘या’ नेत्याने सांगितला

| Updated on: Jan 18, 2023 | 10:38 PM

आमदार कपिल पाटील यांनी बोलताना राज्यातील काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली आहे. काँग्रेसच्या  सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या दोन्ही नेतृत्वार अन्याय झाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील काँग्रेस युवकांना संधी देत नाही; पदवीधरवरून राजकारणाचा स्तरच या नेत्याने सांगितला
Follow us on

नाशिकः सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांमुळे राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकीकडे हे सुरू असतानाच नाशिकमधील सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे काँग्रेसने तांबे पितापुत्रावर टीका केली आहे तर दुसरीकडे लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आता काँग्रेसवर कपिल पाटील यांनी टीका केली आहे.

सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यावरून कपिल पाटील यांनी बोलताना सांगितले की, राज्यातील जी थोडीफार अभ्यासू माणसं आहेत. त्यामध्ये डॉ. सुधीर तांबे आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांची नावं फार महत्वाची आहेत. त्यामुळे नव्या युवा नेतृत्वाला आपण संधी दिली पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून जे कमावलं आहे ते राज्यातील काँग्रेस नेतृत्वाने गमावू नये असं स्पष्ट मत आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे.

त्यांनी राहुल गांधी यांचा गौरव करताना त्यांनी राज्यातील काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली आहे. राज्यातील नेतृत्वाने चांगल्या नेतृत्वाना संधी दिली पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितले.

आमदार कपिल पाटील यांनी बोलताना राज्यातील काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली आहे. काँग्रेसच्या  सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या दोन्ही नेतृत्वार अन्याय झाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.

सत्यजित तांबे यांना या निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा आम्ही देत असून पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीते सत्यजित तांबे हेच विजयी होणार असल्याचा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला.