AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PoK Election Violence: मतदानावेळी हिंसाचार; पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार, 9 जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये मतदानादरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

PoK Election Violence: मतदानावेळी हिंसाचार; पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार, 9 जणांचा मृत्यू
| Updated on: Jul 28, 2026 | 10:45 AM
Share

पाकिस्तानातील ताब्यातील काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या वेळी हिंसाचार आणि गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तर बहुतेक मतदान केंद्रावर तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. काही ठिकाणी बॅलेट बॉक्स देखील जाळण्यात आल्या आहेत. या घटनांमुळे निवडणूक प्रक्रिया प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एका राजकीय कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचंही समोर आलं आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मीरपूर विभागाच्या 13 मतदारसंघात मतदान पार पडले. मतदान सकाळीच सुरू झालं. परंतु दिवसाअखेर अनेक हिसांचाराच्या घटना घडल्या. कोटली जिल्ह्यात दोन विरोधी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, भिंबर आणि कोटलीसहित अनेक भागात बॅलेट बॉक्स जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या व्यतिरिक्त मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याचाही आरोप करण्यात आला. तर काही परिस्थिती बिघडल्यानंतर मतदान काही वेळासाठी थांबवण्यात आलं. मतदानादरम्यान प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले. मतदारांना धमका

वल्याचाही आरोप करण्यात आला.पीपीपी नेत्यांनी निवडणूक आयोगाला हिंसाचार आणि सुरक्षा व्यवस्थेवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तर इतर राजकीय पक्षांनीही मतदानवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक नागरिकांच्या संघटनेनेही मतदान प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

एका राजकीय कार्यकर्त्याचा मृत्यू

कोटली जिल्ह्यात हिंसाचाराची देखील घटना घडली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने म्हटलं की, हिसांचारात पक्षाचा कार्यकर्ता मुख्तार यूनूसचा मृत्यू झाला. पक्षाने या हत्येला राजकीय विरोधकांना जबाबदार ठरवलं आहे. तर विरोधी पक्षांनी आरोप फेटाळून लावले आहेत. या व्यतिरिक्त पाकिस्तान पीपल्स पार्टीने या संबंधी निवडणूक आयोगालाही तक्रार दिला आहे. तसेच त्यांनी मीरपूरमध्ये शस्त्रधारी लोकांनी मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचाही आरोप केला आहे.

Follow Us
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन