Who is Saransh Jain: भारतीय कसोटी संघात अचानक मिळाली एन्ट्री, एकही IPL न खेळता थेट टीममध्ये सामील, गंभीरच्या लाडक्याची घेतली जागा
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने आता संघाची घोषणा केली आहे. या संघात मध्य प्रदेश प्रदेशाच्या सारांश जैनला संघात सामील केले आहे.

15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू सारांश जैनचा संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे. साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह यांची उपलब्धता बीसीसीआयच्या समितीकडून (CoE) मिळणाऱ्या फिटनेस मंजुरीवर अवलंबून असेल. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीसाठी निवडीकरिता अनुपलब्ध आहे. बीसीसीआयने संघाची घोषणा केल्यानंतर एका खेळाडूची विशेष चर्चा रंगत आहे, तो म्हणजे सारांश जैन. सारांशला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. असा समज आहे की आयपीएलमधील कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये खेळाडूला स्थान मिळते पण सारांशच्या बाबतीत असे झालेले नाही. सारांशला एकही आयपीएल सामना न खेळता थेट संघात जागा मिळाली आहे.
या 15 खेळाडूंच्या संघातील सर्वात आश्चर्यकारक निवड म्हणजे सारांश जैन. मध्य प्रदेशच्या या अष्टपैलू खेळाडूने देशांतर्गत क्रिकेट गाजवले आहे. आता त्याने पहिल्यांदाच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवले आहे. उजव्या हाताचा ऑफ-स्पिनर आणि डावखुरा फलंदाज असलेल्या जैनने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. भारत ‘अ’ संघाच्या श्रीलंका दौऱ्यातील प्रभावी कामगिरीनंतर त्याची निवड झाली आहे. दुसऱ्या अनधिकृत कसोटीत जैनने श्रीलंका ‘अ’ संघाच्या पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात दोन बळी घेतले. त्याने फलंदाजी करताना नाबाद 70 धावा देखील केल्या, ज्यामुळे भारत ‘अ’ संघाला 10 गडी राखून विजय मिळवून देत दोन सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकण्यास मदत झाली.
मध्य प्रदेश संघाचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून स्वतःला सिद्ध करून त्याने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने 54 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये आपल्या ऑफ-स्पिन गोलंदाजीने 27.3 च्या सरासरीने 188 बळी घेतले आहेत. खालच्या फळीत फलंदाजी करणारा एक उपयुक्त डावखुरा फलंदाज असलेल्या सारांशने 14 अर्धशतके आणि दोन शतकांसह 31.75 च्या सरासरीने 2223 धावा देखील केल्या आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये, त्याने दोन सामन्यांमध्ये 16 बळी घेत आणि 136 धावा करत मध्य विभागाच्या दुलीप ट्रॉफी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2025-26 रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 57.55 च्या सरासरीने 518 धावा केल्या आणि 20.43 च्या सरासरीने 30 बळी घेतले.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीसाठी भारताचा संघ: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनुरु ब्रार, देवदत्त पडिकल, सारांश जैन
