AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल, पण…, किरण धराडे यांचं मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

माझ्यासोबत आणखी चार नगरसेविका आहेत. त्यासुद्धा शिंदे गटात सहभागी व्हायला तयार आहेत.

आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल, पण..., किरण धराडे यांचं मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 14, 2022 | 4:10 PM
Share

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका किरण धराडे-गामने यांनी उपरोधक पत्र मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलं आहे. किरण धराडे म्हणाल्या, मी ठाकरे गटाची नगरसेविका आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. त्यात असा उल्लेख केला की, संजय राऊत यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आव्हाड यांच्याविरोधात 72 तासात दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळं मी पत्राद्वारे विनंती केली की, राऊत असोत की, आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. आम्ही शिंदे गटात सामिल होण्यासाठी तयार आहोत.

मी स्वतः शिवाय माझ्यासोबत चार नगरसेविका या शिंदे गटात प्रवेश करतील. पण, तुम्ही खोटे गुन्हे दाखल करू नका, असंही किरण धराडे म्हणाल्या. शिंदे गटाकडून बदनाम करण्याचं काम सुरू आहे. खोटे गुन्हे दाखल केले जातात. यासाठी आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल. आमच्या नेत्यांवर निदान खोटे गुन्हे दाखल केले जाणार नाहीत.

शिंदे यांना त्यांची संघटना वाढविण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असतील, तर आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल. त्यासाठी आम्ही तयार आहोत. परंतु, आमच्या नेत्यांवर होणारे खोटे गु्न्हे आम्ही मान्य करणार नाही. ते गुन्हे तुम्ही मागे घ्या. आम्ही तुमच्या संघटनेत सहभागी होऊ, असा उपरोधित टोला नाशिक येथील नगरसेविकेनं लगावला आहे.

माझ्यासोबत आणखी चार नगरसेविका आहेत. त्यासुद्धा शिंदे गटात सहभागी व्हायला तयार आहेत. फक्त आमच्या नेत्यांवरील गुन्हे मागे घ्या, असंही किरण धराडे म्हणाल्यात. राज्यात संजय राऊत यांच्या समर्थनार्थ आंदोलनं सुरू होती. आता जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ आंदोलनं सुरू आहेत. आज फक्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. उद्या आव्हाड, राऊत या नेत्यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी रस्त्यावर उतरतील, असंही त्यांनी सांगितलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.