AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra: सत्ता संघर्षात भरडले जात आहे सरकारी कर्मचारी, वेतन रखडल्याने बजेट बिघडले

गेल्या तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने परिचर, लिपिक अशा कनिष्ठ कर्मचार्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शाळा, महाविद्यालये सुरू होऊन पाल्यांचे शैक्षणिक प्रवेश, शुल्क भरण्यासाठी कर्मचार्‍यांवर अन्यत्र हात पसरविण्याची वेळ आली आहे. बँकांच्या कर्जाचे  हप्ते थकल्याने बँक कर्मचारी परतफेडीसाठी तगादा लावत आहे.

Maharashtra: सत्ता संघर्षात भरडले जात आहे सरकारी कर्मचारी, वेतन रखडल्याने बजेट बिघडले
सत्ता संघर्षात वेतन थकले Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 06, 2022 | 5:10 PM
Share

नाशिक, राज्यातील सत्ता संघर्ष (power struggle maharashtra)मंत्रिमंडळ विस्ताराला (cabinet expansion) होणारा विलंब याचे परिणाम दिसू लागले असून, राज्यातील महिला व बाल विकास विभागाला मंत्री नसल्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन होऊ शकलेले नाही (wage freeze). सलग तीन महिन्यांपासून पगार थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे बजेट बिघडले आहे. दाद तरी कोणाकडे मागावी, असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांना पडला आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत महिला व बालविकास विभाग कार्यरत आहे. अंगणवाडीतील बालके, स्तनदा व गरोदर मातांच्या आरोग्यविषयक तसेच महिलांच्या विकासाच्या योजना राबविणाऱ्या या विभागात नाशिक जिल्ह्यात सुमारे दोनशेहून अधिक कर्मचारी कार्यरत असून, संपलेल्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून या कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाची हेळसांड राज्य सरकारच्या पातळीवर होत आहे.

या सगळ्याचा नियमित वेतनावर परिणाम होत आहे. मार्च व एप्रिल महिन्यांचे वेतन मे महिन्यात झाल्यानंतर या विभागातील कर्मचाऱ्यांना मे, जून व जुलै या तीन महिन्यांचे वेतन ऑगस्ट उजाडूनही होऊ शकलेले नाही. याच विभागांतर्गत कार्यरत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस यांचे वेतन मात्र नियमित होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात गेल्या महिन्यापासून सत्ता संघर्ष सुरु आहे.

हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सरकार अस्तित्वात असले तरी, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाला पूर्णवेळ मंत्री नसल्यामुळेच महिला व बाल विकास विभागाचा कारभार ठप्प झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कर्जाचे हप्ते थकले

गेल्या तीन महिन्यांपासून वेतन होत नसल्यामुळे काही कर्मचार्‍यांनी महिला व बाल विकास विभागाच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली, त्यांनी या संदर्भात संबंधित विभागाच्या सचिवांशी बोलू असे आश्‍वासन दिले, मात्र, प्रश्‍न सुटू शकलेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने परिचर, लिपिक अशा कनिष्ठ कर्मचार्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शाळा, महाविद्यालये सुरू होऊन पाल्यांचे शैक्षणिक प्रवेश, शुल्क भरण्यासाठी कर्मचार्‍यांवर अन्यत्र हात पसरविण्याची वेळ आली आहे. बँकांच्या कर्जाचे  हप्ते थकल्याने बँक कर्मचारी परतफेडीसाठी तगादा लावत आहेत.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...