AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनमाडमध्ये सणासुदीत विजेचा लपंडाव; सर्वपक्षीय नेते रस्त्यावर, महावितरणविरोधात संताप

मनमाडमधील सर्वपक्षीय नेते आणि शेकडो नागरिकांनी पुणे-इंदूर मार्गावर रात्री अचानक ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

मनमाडमध्ये सणासुदीत विजेचा लपंडाव; सर्वपक्षीय नेते रस्त्यावर, महावितरणविरोधात संताप
मनमाडमध्ये भारनियमनाविरोधात सर्वपक्षीय नेते आणि नागरिक रस्त्यावर उतरले.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 07, 2022 | 1:14 PM
Share

मालेगावः वारंवार होणारी वीज गुल, त्यात अचानक सुरू झालेले भारनियमन यामुळे मनमाडकर संतापले असून, त्यांनी बुधवारी रात्रीच पुणे-इंदूर महामार्गावर धाव घेत रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. रात्री पावणेबारा ते बारापर्यंत हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. जेव्हा वीजपुरवठा सुरू करण्यात आला, तेव्हाच हे आंदोलन मागे घेण्यात आला. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात विविध सण आणि उत्सव. त्यात महावितरणच्या सावळ्या गोंधळाने नागरिक आक्रमक होत आहेत. येणाऱ्या काळात हे भारनियमन असेच सुरू राहिले, तर पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आधीच थकबाकी वसुलीने मेटाकुटीला आलेल्या महावितरणसमोर आता नवीनच पेचप्रसंग उभा राहिलाय.

सर्वपक्षीय एकजूट झाली…

शिवसेना आणि भाजपमध्ये राज्यात सध्या आडवा विस्तू जाताना दिसत नाही. मात्र, इथे महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते, नेते रस्त्यावर उतरलेच. सोबतच इतर सारेच राजकीय पक्ष या आंदोलनात सहभागी झाली. त्यामुळे लोकांत किती असंतोष आहे, हे समोर येत आहे. सध्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तोंडावर आलीय. त्याची तयारी अनेक ठिकाणी उत्साहात सुरू आहे. मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू आहेत. हिंदू धर्मियांमध्ये प्रभू रामचंद्रांचे नवरात्र सुरू आहे. या सणाच्या काळात भारनियमन होत असल्याने सर्व नागरिकांमध्ये टोकाचा संताप आहे.

पोलिसांची उडाली तारंबळ

शेकडो लोकांनी पुणे-इंदूर मार्गावर रात्री अचानक ठिय्या आंदोलन सुरू केल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे पोलिसांचीही कोंडी झाली. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक तुंबली. शेवटी रात्री उशिरा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यालाही पावणेबारा-बारा वाजले. तोपर्यंत आंदोलन सुरूच होते. भारनियमन सुरूच राहिले, तर आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला आहे. इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली