AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानसरोवरसाठी गेलेल्या 80 पर्यटकांपैकी चौघांशीच संपर्क, गिरीश महाजन यांचं नागरिकांना आवाहन काय?

नेपाळमधील भीषण जलप्रलयात महाराष्ट्राचे 80 मानसरोवर पर्यटक अडकले आहेत, त्यापैकी फक्त चार जणांशी संपर्क होऊ शकला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांचे नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी नेपाळला गेले असल्यास तातडीने माहिती द्यावी. सरकार 24 तास अलर्ट मोडवर असून बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मानसरोवरसाठी गेलेल्या 80 पर्यटकांपैकी चौघांशीच संपर्क, गिरीश महाजन यांचं नागरिकांना आवाहन काय?
girish mahajanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2026 | 12:37 PM
Share

नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयात 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. नेपाळच्या इतिहासातील हा सर्वात मोठा जलप्रलय असल्याचं सांगितलं जात आहे. पाऊस नसतानाही तिबेटमधून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे येथील घरेदारे, इमारती, पूल, टॉवर आणि गावच्या गावच वाहून गेली आहेत. माणसं आणि जनावरंही पाण्याबरोबर गडप झाली आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये हाहा:कार उडाला आहे. नेपाळच्या मानसरोवरसाठी भारतातूनही अनेक पर्यटक गेले होते. महाराष्ट्रातून 80 पर्यटक गेले होते. त्यातील अनेक पर्यटक वेगवेगळ्या राज्यातील आहेत. मात्र, या पर्यटकांपैकी फक्त चारच पर्यटकांशी संपर्क झाला असल्याचं राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. तसेच, तुमचे नातेवाईक, शेजारी किंवा ओळखीचे कोणी नेपाळला गेले असतील तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही त्या लोकांचा शोध घेऊ, असं आवाहन महाजन यांनी केलं आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. नेपाळमध्ये ग्लेशियर तुटल्याने नद्यांना महापूर आला. या महापुरामुळे गावं विदारक परिस्थितीत वाहून गेली आहेत. मानसरोवरलाही मोठा पूर आला. आपले काही पर्यटक तिकडे गेले आहेत. रिचा टूर ट्रॅव्हल्सच्या दोन गाड्यांमधून पर्यटक मानसरोवरला गेले. 80 पैकी चार जणांशी संपर्क झाला आहे. माझ्या शेजारचं कुटुंबही पाच सहा दिवसापूर्वी नेपाळला गेलं होतं. मी लगेच त्यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या गाडीत 37 लोक आहेत. ते सर्व कुठले आहेत ते माहीत नाही. काही आंध्र प्रदेशातील आणि दक्षिणेकडील आहेत. महाराष्ट्रातील किती लोक त्यात आहेत हे समजू शकलं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

24 तास अलर्ट मोडवर

माझ्या शेजारच्या लोकांशी माझा संपर्क झाला होता. त्यानंतर मी आज परत सकाळपासून त्यांच्याशी संपर्क करतोय. तो होत नाही. ते प्रदक्षिणा करत आहेत. या आधी त्या चार जणांशी संपर्क झाला होता. ते सुखरूप आहेत. अजून किती लोक अडकलेत याची आम्ही माहिती घेत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनाही माहिती घेण्यास सांगितलं आहे. वेबसाईटही खुली केली आहे. कुणाकडे काही माहिती असेल तर कळवा. दिल्लीशी संपर्क सुरू आहे. आम्ही सर्वजण 24 तास अलर्ट मोडवर आहोत. कुणाला काही माहिती मिळाली तर आमच्याशी संपर्क करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

नेपाळ सरकारच्या संपर्कात

आम्ही नेपाळ सरकारशीही संपर्क साधून आहोत. पंतप्रधानही त्यात लक्ष घालून आहोत. आम्ही माहिती घेतच आहोत. कुणाकडे माहिती असेल तर सांगा. 80 पैकी चार लोकांशी संपर्क झाला. केंद्र आणि राज्य अलर्ट मोडवर आहे. आम्ही लोकांना इतरांची माहिती विचारत आहोत. आम्हाला कळवा. जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. तुमच्या आजूबाजूचे, नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी गेले असतील तर तात्काळ कळवा. म्हणजे शोध घेता येईल, असंही ते म्हणाले.

Follow Us
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात
नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; पाऊण तास उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात नेमकं काय होतं?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज