AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान के घर, देर हे पर अंधेरा नहीं; शेतकऱ्यांना तब्बल साडे चौदा लाख रुपये नुकसान भरपाई; ग्राहकमंचचे आदेश

इगतपुरी तालुक्यातील दशरथ मोतीराम मते आणि विशाल दशरथ मते यांची वर्षभराची सर्व भिस्त असते वडिलोपार्जित शेतीवरच. दोन वर्षांपूर्वी विशाल यांनी वडीवरहे येथील बियाण्यांच्या दुकानातून नन्हेमस मिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीचे दोडक्याची बियाणे खरेदी केले होते.

भगवान के घर, देर हे पर अंधेरा नहीं; शेतकऱ्यांना तब्बल साडे चौदा लाख रुपये नुकसान भरपाई; ग्राहकमंचचे आदेश
नाशिकमधील इगतपुरीच्या शेतकऱ्यांना ग्राहकमंचकडून नुकसानभरपाईImage Credit source: tv9marathi
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: May 29, 2022 | 8:15 PM
Share

नाशिकः ते म्हणतात ना भगवान के घर देर हे पर अंधेरा नही याचीच प्रचिती इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील शेतकऱ्याल आली आहे. तब्बल दोन वर्षाच्या यशस्वी लढ्यानंतर निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे (poor quality) शेतकऱ्यांना नुकसान (Farmers Loss) भरपाई देण्यात यावी असे आदेशच ग्राहक पंचायतीने दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर बियाणे कंपन्यांना दणका बसला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यानंतर त्याची माहिती कंपनीला देण्यात आली. त्यानंतरहा कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत अथवा मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नंतर जिल्हा ग्राहकमंचमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यातील दशरथ मोतीराम मते आणि विशाल दशरथ मते यांची वर्षभराची सर्व भिस्त असते वडिलोपार्जित शेतीवरच. दोन वर्षांपूर्वी विशाल यांनी वडीवरहे येथील बियाण्यांच्या दुकानातून नन्हेमस मिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीचे दोडक्याची बियाणे खरेदी केले होते. त्या बियाणांची योग्यप्रकारे लागवडही करण्या आली.

वेलीला फुले नाहीत फळे नाहीत

दहा फुटांपर्यंत दोडक्याच्या वेल आली, परंतु कोणत्याही प्रकारचे फळ न लागल्यामुळे त्यांनी संबधित कंपनीला याबाबतची माहिती देण्यात आली. ही माहिती कंपनीला देऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. संबंधित शेतकऱ्यांनी इगतपुरी येथील कृषी विभागाला या घटनेची माहिती दिली.

कंपनीचीही चौकशी

कृषी अधिकारी शीतल कुमार तवर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर तज्ज्ञांच्या समितीने बियाणे निकृष्ट असल्याचा अहवाल दिला आणि संबंधित कंपनीची विचारणाही केली. त्यानंतरही कोणत्याही प्रकारचा न्याय शेतकऱ्याला मिळाला नाही.

ग्राहकमंचमध्ये तक्रार दाखल

यानंतरदेखील खचून न जाता विशाल आणि दशरथ मते यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या ठरावाच्या आधारे जिल्हा ग्राहकमंचमध्ये तक्रार दाखल केली. ग्राहक मंचाने संबंधित कंपनी आणि शेतकरी दोघांचीही बाजू ऐकून घेत शेतकऱ्यांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल देत शेतकऱ्यांना तब्बल साडे चौदा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मानसिक त्रास झाल्याने 15000 आणि इतर खर्च 10000 देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Follow Us
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.