AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान के घर, देर हे पर अंधेरा नहीं; शेतकऱ्यांना तब्बल साडे चौदा लाख रुपये नुकसान भरपाई; ग्राहकमंचचे आदेश

इगतपुरी तालुक्यातील दशरथ मोतीराम मते आणि विशाल दशरथ मते यांची वर्षभराची सर्व भिस्त असते वडिलोपार्जित शेतीवरच. दोन वर्षांपूर्वी विशाल यांनी वडीवरहे येथील बियाण्यांच्या दुकानातून नन्हेमस मिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीचे दोडक्याची बियाणे खरेदी केले होते.

भगवान के घर, देर हे पर अंधेरा नहीं; शेतकऱ्यांना तब्बल साडे चौदा लाख रुपये नुकसान भरपाई; ग्राहकमंचचे आदेश
नाशिकमधील इगतपुरीच्या शेतकऱ्यांना ग्राहकमंचकडून नुकसानभरपाईImage Credit source: tv9marathi
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: May 29, 2022 | 8:15 PM
Share

नाशिकः ते म्हणतात ना भगवान के घर देर हे पर अंधेरा नही याचीच प्रचिती इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील शेतकऱ्याल आली आहे. तब्बल दोन वर्षाच्या यशस्वी लढ्यानंतर निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे (poor quality) शेतकऱ्यांना नुकसान (Farmers Loss) भरपाई देण्यात यावी असे आदेशच ग्राहक पंचायतीने दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर बियाणे कंपन्यांना दणका बसला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यानंतर त्याची माहिती कंपनीला देण्यात आली. त्यानंतरहा कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत अथवा मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नंतर जिल्हा ग्राहकमंचमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यातील दशरथ मोतीराम मते आणि विशाल दशरथ मते यांची वर्षभराची सर्व भिस्त असते वडिलोपार्जित शेतीवरच. दोन वर्षांपूर्वी विशाल यांनी वडीवरहे येथील बियाण्यांच्या दुकानातून नन्हेमस मिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीचे दोडक्याची बियाणे खरेदी केले होते. त्या बियाणांची योग्यप्रकारे लागवडही करण्या आली.

वेलीला फुले नाहीत फळे नाहीत

दहा फुटांपर्यंत दोडक्याच्या वेल आली, परंतु कोणत्याही प्रकारचे फळ न लागल्यामुळे त्यांनी संबधित कंपनीला याबाबतची माहिती देण्यात आली. ही माहिती कंपनीला देऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. संबंधित शेतकऱ्यांनी इगतपुरी येथील कृषी विभागाला या घटनेची माहिती दिली.

कंपनीचीही चौकशी

कृषी अधिकारी शीतल कुमार तवर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर तज्ज्ञांच्या समितीने बियाणे निकृष्ट असल्याचा अहवाल दिला आणि संबंधित कंपनीची विचारणाही केली. त्यानंतरही कोणत्याही प्रकारचा न्याय शेतकऱ्याला मिळाला नाही.

ग्राहकमंचमध्ये तक्रार दाखल

यानंतरदेखील खचून न जाता विशाल आणि दशरथ मते यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या ठरावाच्या आधारे जिल्हा ग्राहकमंचमध्ये तक्रार दाखल केली. ग्राहक मंचाने संबंधित कंपनी आणि शेतकरी दोघांचीही बाजू ऐकून घेत शेतकऱ्यांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल देत शेतकऱ्यांना तब्बल साडे चौदा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मानसिक त्रास झाल्याने 15000 आणि इतर खर्च 10000 देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Follow Us
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?