AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना रुग्णांमुळे पांगरीची शाळा बंद; सिन्नर, निफाड, येवल्यालात कडक निर्बंध लावण्याचा इशारा

सिन्नर तालुक्यातल्या पांगरी येथे वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सात दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिन्नर, निफाड आणि येवल्यात सातत्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या तालुक्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांमुळे पांगरीची शाळा बंद; सिन्नर, निफाड, येवल्यालात कडक निर्बंध लावण्याचा इशारा
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Oct 09, 2021 | 10:28 AM
Share

नाशिकः सिन्नर तालुक्यातल्या पांगरी येथे वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सात दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिन्नर, निफाड आणि येवल्यात सातत्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या तालुक्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली. तिसरी लाट तूर्तास तरी येण्याची शक्यता नाही, असे मानून राज्य सरकारने चार ऑक्टोबरपासून शाळा सुरू केल्या. विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत स्वागत करण्यात आले. मात्र, सिन्नर तालुक्यातील रुग्णवाढ थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पांगरी येथील शाळा बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आहे. सोबतच संत हरिबाबा विद्यालय येत्या अकरा ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पांगरीत सध्या कोरोनाचे 18 रुग्ण सक्रिय आहेत. सध्या जिल्ह्यात सिन्नर, निफाड, येवल्यात तालुक्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. येथे रुग्ण वाढणे कमी झाले नाही, तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. तसेच या शहरातील हॉटस्पॉट शोधून चाचण्या वाढवा. तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करा. कठोर निर्बंध लावण्याची वेळ आणू नका, असा इशाही भुजबळांनी दिला आहे.

नगरमुळे वाढतायत रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.

दर्शनाचे नियम कडक

कोरोना काळात वणीच्या सप्तशृंगीगडावरील मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.

इतर बातम्याः

भुजबळ-कांदे वादानंतर आता आणखी दोन बडे नेते आमनेसामने, नाशिकमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद विकोपाला

पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या साखर कारखान्यावर 12 तास छापेमारी, सकाळी पुन्हा झडाझडती; नंदूरबारमध्ये उलटसुलट चर्चा

Follow Us
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....