AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामनवमीच्या दंगलीनंतर एसआयटी का नाही नेमली?; संजय राऊत यांचा भाजपला परखड सवाल

संदलची परंपरा 100 वर्षांची आहे. मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. मोदींपासून आम्ही सगळे अजमेर शरीफला जातो. माहीम आणि हाजी अलीच्या दर्ग्यात जातो.

रामनवमीच्या दंगलीनंतर एसआयटी का नाही नेमली?; संजय राऊत यांचा भाजपला परखड सवाल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 17, 2023 | 10:06 AM
Share

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून काही मुस्लिम मंडळीने चादर चढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. रामनवमीच्या वेळी दंगल झाली होती. कधी नव्हे ती पहिल्यांदाच महाराष्ट्रात दंगल झाली होती. त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती का? असा परखड सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

एसआयटी कसल्या नेमता? तुम्हाला माहीत नाही महाराष्ट्रात काय चाललं ते? राम नवमी संदर्भात एसआयटी नेमली का? राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात दंगल झाली नव्हती. त्यावर एसआयटी नेमली का नाही नेमली? अशा अनेक प्रकार आहेत. या सरकारच्या पायाखालची जमीन हादरली आहे. त्याचा हा परिणाम आहे. राज्यात सामाजिक सलोखा राखायला हवा. दंगली घडवून निवडणुका जिंकायचं असेल तर ते होणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

गदा तुमच्या डोक्यात बसली

कर्नाटकातही शेवटच्या चार दिवसात पंतप्रधानांनी बजरंग बलीची गदा फिरवली. ती गदा तुमच्याच डोक्यात बसली. हनुमान चालीसा करून वातावरण बिघडवता हे तुमचे धंदे आहेत. हा तुमचा व्यवसाय आहे. हिंदुत्व हा आमचा व्यवसाय नाही. हिंदुत्व ही आमची राजकीय रोजीरोटी नाही. हिंदुत्व ही आमची श्रद्धा, संस्कार आणि संस्कृती आहे. ज्यांचे ते नाही ते अशा दंगली घडवत आहेत, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

संघाचे लोक हाजी अलीला जातात

कोणीही त्र्यंबक मंदिरात घुसल्याची माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून पत्र द्यायला लावलं. त्यांनीच त्र्यंबकेश्वरला बंद करायला सांगितलं आहे. संदलची परंपरा 100 वर्षांची आहे. मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. मोदींपासून आम्ही सगळे अजमेर शरीफला जातो. माहीम आणि हाजी अलीच्या दर्ग्यात जातो. त्यात संघाचे लोकही आहेत. मला माहीत आहे. पोलीसही चादर चढवतात. पण त्र्यंबकेश्वरच्या नावाने महाराष्ट्रातील वातावरण उद्ध्वस्त करायचं. नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारायच्या हे प्रकार सुरू आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.