AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : कारभार समर्थपणे करू, असा दोघांनाही विश्वास असावा; मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यावरून शरद पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

मुख्यमंत्र्यांनी कुठे दौरा काढावा, हा त्यांचा निर्णय आहे, अशी टीका शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. विरोधी पक्षांनी जेथे नुकसान झाले तेथेच दौरे काढले. त्यामुळे याच्यातून ज्याने-त्याने बोध घ्यावा, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

Sharad Pawar : कारभार समर्थपणे करू, असा दोघांनाही विश्वास असावा; मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यावरून शरद पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारImage Credit source: Twitter
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 29, 2022 | 3:30 PM
Share

नाशिक : दोघांनाही आपण समर्थपणे कारभार करू शकतो असा आत्मविश्वास असावा, म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारला लगावला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. सध्या राज्यात मंत्रिमंडळ नसून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असे दोघेच कारभार पाहत आहेत. राज्यात पूरपरिस्थिती (Flood situation) असून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. त्यामुळे मदत आणि इतर कार्ये करण्यात मर्यादा येत आहेत. अशावेळी विरोधी पक्षांकडून मंत्रिमंडळ (Cabinet expansion) कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांना हा टोला लगावला आहे.

‘हे बरोबर नाही’

राज्य सरकारकडून अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली जात आहे. त्यावर पवार म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारकडून विविध प्रकल्पांना मान्यता घेण्यात आली होती. त्याचे टेंडर काढलेले होते. कामे सुरू असताना अशावेळी कोणत्याही प्रकल्पांना स्थगिती देणे योग्य नाही. अनेक प्रकल्पात त्रुटी असल्याचे कारण पुढे करत सुडाच्या भावनेने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय तसेच प्रकल्पांना स्थगिती शिंदे-फडणवीस यांच्याकडून दिली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.

काय म्हणाले शरद पवार?

‘कुठे जायचे हा त्यांचा निर्णय’

मुख्यमंत्र्यांनी कुठे दौरा काढावा, हा त्यांचा निर्णय आहे, अशी टीका शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री केवळ आपल्या गटातील आमदारांच्याच मतदारसंघात दौरे काढत असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. त्यावर पवारांनी आपले मत व्यक्त केले. ते दौरे काढत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. विरोधी पक्षांनी जेथे नुकसान झाले तेथेच दौरे काढले. त्यामुळे याच्यातून ज्याने-त्याने बोध घ्यावा, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. याचवेळी एकूण परिस्थिती चिंताजनक असल्याचेही शरद पवार म्हणाले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...