AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुख्यमंत्री आता ठाण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत”; ‘या’ नेत्यानं शिंदे गटाविषयीचा विश्वास बोलून दाखवला…

मंत्री उदय सामंत यांनी ज्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री आता ठाण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत; 'या' नेत्यानं शिंदे गटाविषयीचा विश्वास बोलून दाखवला...
| Updated on: Jan 26, 2023 | 9:55 PM
Share

नवी मुंबईः राज्यात पदवीधर मतदार संघाची निवडणूक लागल्याने आणि पुण्याची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून यामध्ये शिंदे गट आणि मविआचे नेते आमने सामने आले आहेत. पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापले असतानाच शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी थेट सुप्रिया सुळे यांनाच थेट आव्हान केले आहे.

राज्यात भाजपनंतर आमचाच पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षावर टीका करताना विचारा करावा असा इशारा सुप्रिया सुळे यांना देण्यात आला आहे.

पोटनिवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप केले जात आहे, तर शिंदे गटाने मोर्चे बांधणी केल्याची टीका काही राजकीय नेत्यानी केली होती. त्यावर बोलताना उदय सामंत यांनी म्हटले आहे की, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमचा पक्ष कधीही मोर्चेबांधणी करत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मंत्री उदय सामंत यांनी ज्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या ठाण्याचा दौरा केला आहे. त्यावर टीका करताना त्यांनी मुख्यंमत्री आता ठाण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मतदार संघात जे सभा घेतात त्यांना शुभेच्छा असं म्हणत त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

शिंदे गटावर अनेक राजकीय नेत्यांकडून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये तू तू मैं मैं असल्याचीही काहीजणांकडून टीका केली जाते. त्या नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणजे 50 आमदारांचा आणि खासदारांचा विश्वास एकनाथ शिंदे यासारख्या मुख्यमंत्र्यांवर आहे.

त्यामुळे आमच्यामध्ये फूट पडण्याचा हा बालिशपणा असल्याचे सांगत विरोधकांचा हा डाव कधीही यशस्वी होणार नाही असा पलटवारही त्यांनी यावेळी केला आहे. तर पुण्याच्या पोटनिवडणुकीविषयी बोलतानाही त्यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....