सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनवरुन आरबीआय दिले सडतोड उत्तर

old pension scheme | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप सुरु केली आहे. या संपात सर्व राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे. परंतु यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेने जुनी पेन्शन योजनासंदर्भात राज्यांना इशारा दिला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनवरुन आरबीआय दिले सडतोड उत्तर
old pension scheme
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 8:40 AM

मुंबई, 14 डिसेंबर | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा आणि कंत्राटीकरण बंद करा, ही मागणी कर्मचाऱ्यांची आहे. या संपात सर्व राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे. राज्य सरकार आज विधिमंडळात यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गंभीर इशारा दिला आहे. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास विकासकामांसाठी पैसेच राहणार नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

काय म्हटले आरबीआयने

निवडणुकी दरम्यान अनेक राजकीय पक्ष जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन देत आहे. काही राज्यांनी ही पेन्शन योजना लागू केली आहे. परंतु या प्रकरणात आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. आरबीआयने राज्यांना इशारा दिला आहे. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास खर्च अनेक पटींनी वाढणार आहे. यामुळे विकासकामांना पैसा पुरणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.

४.५ पटीने राज्यावर बोजा वाढणार

जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्यांचा बोजा ४.५ पटींने वाढणार आहे. देशाच्या विकास दरावर त्याचा परिणाम होणार आहे. २०६० पर्यंत याचा बोजा ०.९ टक्के जाईल. यामुळे सरकारला विकास कामे करण्यासाठी निधी उरलणार नाही. आरबीआयने “स्टडी ऑफ बजेट्स ऑफ २०२३-२४” हा अहवाल दिला आहे. त्यात हा इशारा दिला आहे. तसेच अहवालात काही सल्लेही दिले आहे.

हे सुद्धा वाचा

काय दिले सल्ले

सर्व राज्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. कर चोरी रोखण्यासोबत अवैध उत्खनन रोखण्यावर आणि कर संकलन वाढवण्यावर भर द्यावा. उत्पादन शुल्क, मालमत्ता कर, मुद्रांक नोंदणी शुल्क, वाहन कर यासंदर्भात फेरविचार करण्याचा सल्ला भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यांना दिला आहे. यामुळे एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी दुसरीकडे आरबीआयचा इशारा अशा दुहेरी कचाट्यात राज्य सरकार अडकले आहे. महाराष्ट्र सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही, परंतु २००५ मध्ये सुरु केलेल्या पेन्शन योजनेत सुधारणा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.