AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्दुल सत्तार यांचा बोलविता धनी वेगळा, संजय पवार यांचा आरोप

शिवसैनिकच नाही तर बाळासाहेबांवर प्रेम करणारी लोकं याला उत्तर देतील.

अब्दुल सत्तार यांचा बोलविता धनी वेगळा, संजय पवार यांचा आरोप
संजय पवार यांनी दिला इशारा Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Oct 28, 2022 | 6:29 PM
Share

कोल्हापूर : उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय पवार म्हणाले, मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली टीका अशोभनीय आहे. एका मंत्र्यांनी अशी टीका करणे योग्य नाही. गेल्या आठ दिवसात ते उर्मट बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पायउतार करावं. अन्यथा ते तुम्हालाच गोत्यात आणणार. मंत्री पद टिकवण्यासाठी अशी टीका करावी लागते. ते स्वतः बोलत नाही त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. पण, अशीच वक्तव्य सुरू राहिली तर याचा महाराष्ट्रात उद्रेक होईल, असा इशारा संजय पवार यांनी दिला.

शिवसैनिकच नाही तर बाळासाहेबांवर प्रेम करणारी लोकं याला उत्तर देतील. आज ना उद्या श्रीलंकेत जसं घडलं तसं इथे घडायला वेळ लागणार नाही.

संजय पवार म्हणाले, टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला जाणार हे राज्य सरकारचे मोठं अपयश आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा भाजपचा अनेक वर्षापासूनचा डाव आहे.

त्या दृष्टीने भाजपची कूच सुरु आहे. महाविकास आघाडी काळातच प्रकल्प गुजरातला गेला. म्हणणाऱ्या उदय सामंत यांनी पुरावे द्यावेत. उदय सामंत कोल्हापुरात आल्यास उद्योगधंदे गुजरातला जात असल्याबद्दल जाब विचारणार असल्याचंही संजय पवार म्हणाले.

ज्या मातोश्रीमुळे नारायण राणे मोठे झाले, त्यांच्यावर टीका करताना भान ठेवलं पाहिजे. ॲक्शनला अशीच रिएक्शन येणार असंही संजय पवार यांनी सांगितलं.

बच्चू कडू यांच्याबाबत बोलताना संजय पवार म्हणाले की, बच्चू कडूंप्रमाणेच शिंदे गटात गेलेल्या अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. दिवसेंदिवस ही अस्वस्थता वाढत जाणार आहे. त्यामुळे सरकार फार दिवस टिकणार नाही. तिकडे गेलेले मूळचे शिवसैनिकच आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा