AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand Padalkar | ‘गोपीचंद पडळकर यांनी स्वत:ला आवर घालावा’, महसूल मंत्र्यांचा सल्ला

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. त्यांच्या या टीकेचे पडसाद राज्यभरातील अनेक भागांमध्ये बघायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी पडळकरांना सल्ला दिलाय.

Gopichand Padalkar | 'गोपीचंद पडळकर यांनी स्वत:ला आवर घालावा', महसूल मंत्र्यांचा सल्ला
| Updated on: Sep 19, 2023 | 3:05 PM
Share

अहमदनगर | 19 सप्टेंबर 2023 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारमधील ते महत्त्वाचे मंत्री आहेत. असं असताना सरकारमधीलच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्याने सत्ताधारी पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. असं असताना भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकर यांना स्वत:ला आवर घालावा, असा सल्ला दिला आहे.

“गोपीचंद पडळकर आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक दिवसांपासून आहे. ते एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे होते. आपण आता एकत्र असल्याने त्यांनी विधान करताना स्वतःला आवर घालावा. सरकारच्या स्थैर्यासाठी आपसातले मतभेद बाजूला ठेवावे”, असा सल्ला विखे पाटील यांनी दिला.

आनंदाचा शिधा किटमध्ये त्रुटी

दरम्यान, आनंदाचा शिधा किटमध्ये त्रुटी असल्याचे महसूलमंत्र्यांनी मान्य केलंय. “आनंदाच्या शिध्याबाबत सोलापूरसह राज्यात गंभीर तक्रारी आल्या आहेत. पाल्म ऑईल वापरू नये. मात्र तरी ते दिले जाते. पाल्म ऑईलचा दर्जा अतिशय खालावलेला आहे. शिधा किटचे वजन कमी भरतंय. याप्रकरणी चौकशी सुरू असून दोषी एजन्सीवर कारवाई करणार”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

‘सामना’ अग्रलेखावर टीका

राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘सामना’च्या अग्रलेखावरही टीका केली. “ज्यांना पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी आगोदर स्वतःची विश्वासार्हता निर्माण करावी. एखाद्या वर्तमान पत्रातून टीका म्हणजे जनमत नाही. सामनातून पूर्वग्रह दूषित लिखाण होते. जनतेचा विश्वास गमावलेल्या लोकांच्या टीकेने काहीही परिणाम होणार नाही. लोकशाही आणि सरकार अधिक मजबूत होईल”, असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

विखे पाटील आमदार अपात्र सुनावणीवर म्हणाले…

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाजू खरी आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो. आम्हाला विजयाची खात्री आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच विजय होणार”, असं विखे पाटील म्हणाले.

पाथरी विकासनिधीवर काय म्हणाले?

“पाथरीला साईबाबांची जन्मभूमी म्हणून विकास निधी दिला नाही. मागच्या वेळी वाद उपस्थित झाला तेव्हा शिर्डीकरांनी सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडले. साईबाबांच्या जन्मभूमीबद्दल कोणतेही पुरावे नाहीत. जन्मभूमीचा वाद होऊ नये. साईबाबा शिर्डीत प्रकट झाल्याचा इतिहास आहे”, असं स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिलं.

“पाथरीला साईबाबांची जन्मभूमी म्हणून निधी देण्याला विरोध आहे. पाथरी साईबाबांची जन्मभूमी नाहीच. कुणीतरी दावा केला म्हणून मान्य करायचे का? निधी नेमका कशासाठी दिला याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.