AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान; पोपटराव पवार यांनी काढला यावर हा उपाय

यासाठी काही ठिकाणी विधायक मार्ग शोधण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी शोधलेला मार्ग. या उपायाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान; पोपटराव पवार यांनी काढला यावर हा उपाय
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 16, 2023 | 5:12 PM
Share

अहमदनगर : सध्या राज्यात जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी शिक्षकांचाही संप सुरू आहे. या संपाचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रात होत आहे. आरोग्य विभागात शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. महसूल विभागाची काम ठप्प पडली आहेत. शिक्षकही संपावर गेले आहेत.  त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. काळी शिक्षक जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून संपावर गेले आहेत. तरी काही शिक्षक शिकवत आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांअभावी नुकसान होतं, त्यांचं काय, यासाठी काही ठिकाणी विधायक मार्ग शोधण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी शोधलेला मार्ग. या उपायाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पाहुयात काही आहे हा उपाय.

अनोख्या उपक्रमाची चर्चा

मात्र यावर अहमदनगरला हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी थेट शाळा गाठली. स्वतः पुस्तक हातात घेऊन मुलांना शिक्षणाचे धडे दिले. हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या या अनोखा उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरेबाजार येथे हे काम सुरू आहे.

यांचा शिक्षणासाठी पुढाकार

यात सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, सोसायटी चेअरमन पालक संघाचे सदस्य आणि गावातील सुशिक्षित पालक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. तसेच कोविड काळातील फ्रंटलाईन टीम हे संप सुरू झाल्यापासून अध्यापनाचे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थामार्फत प्राथमिक शाळा सकाळी ७.३० ते ११ आणि माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांशी साधता येतो संवाद

गावाला आदर्श करण्यात पोपटराव पवार यांचा मोठा वाटा आहे. अजूनही गावातील लोकं त्यांचं म्हणण ऐकतात. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही. गावकऱ्यांनाही चांगली संधी मिळते. विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो. यात विद्यार्थ्यांचा फायदा होत आहे. प्रत्येक गावी असा उपक्रम राबवल्यास गावातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय