AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भो भो करण्याची काहींना सवय”; कालीचरण महाराज यांची एमआयएमवर सडकून टीका

कालीचरण महाराज यांनी द केरला स्टोरीवर मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने पहावा त्यावर चिंतन करा, ते तुमच्याबरोबर होऊ शकते. धर्म आणि आई बहिणींची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर अशा सिनेमांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांना यावेळी व्यक्त केले.

भो भो करण्याची काहींना सवय; कालीचरण महाराज यांची एमआयएमवर सडकून टीका
| Edited By: | Updated on: May 14, 2023 | 9:23 PM
Share

अहमदनगर : भगवे कपडे घालून कुणी स्वामी आणि गुरु होत नाही, आणि भगवे कपडे घातले म्हणजे त्यांना आता गुरु म्हणायला सुरुवात केली जात असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कालीचरण महाराज यांच्यावर केली होती. त्यावरून जोरदार हंगामा माजला आहे. इम्तियाज जलील यांनी कालीचरण महाराज यांच्यावर टीका करताच कालीचरण यांनी त्यांना सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता जलील आणि कालीचरण महाराज यांचे वाकयुद्ध रंगले असल्याचे दिसून येत आहे.

कालिचरण महाराजांनी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या टिकेला उत्तर देताना म्हटले आहे की, भो-भो करण्याची काहींना सवय असते मात्र आम्ही आमचं काम करत राहू असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार आम्ही आमचे काम करत राहू.

तुम्ही येत असाल तर तुमच्यासोबत काम करू नसेल येत तर तुमच्याशिवाय काम करू अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे.

तुम्हाला बोलण्यापासून कोणी अडवलं, कोणी निंदा कोणी वांदा कालीकीर्तनचा आमचा धंदा, सत्य सांगण्याचा आमचा धंदा आहे आणि आम्ही बोलत राहू अशा शब्दात त्यांनी इम्तियाज जलील सुनावले आहे.

तसेच कालीचरण महाराज यांनी द केरला स्टोरीवर मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने पहावा त्यावर चिंतन करा, ते तुमच्याबरोबर होऊ शकते. धर्म आणि आई बहिणींची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर अशा सिनेमांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांना यावेळी व्यक्त केले.

जे हिंदू जण जागृती करत असतात त्यावर काही लोक बंदी आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे राज सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्नही केला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

स्वार्थ साधण्यासाठी बजरंग दलावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे आम्ही सत्य सांगतो आहे त्यामुळे त्यांच्या पोटात कळ उठत आहे असा टोलाही त्यांनी हिंदूविरोधी टीका करणाऱ्यांवर केला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.