AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Accident | चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत, मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाख, 9 मजुरांचा भाजून मृत्यू

आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये होते. प्लास्टिक पोत्यांमधून हे मृतदेह चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

Chandrapur Accident | चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत, मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाख, 9 मजुरांचा भाजून मृत्यू
चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदतImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 4:44 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल ( Chandrapur-Mul) महामार्गावर अजयपूर (Ajaypur) येथे दोन दिवसांपूर्वी अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही रक्क्म देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघात झाला. यानंतर मोठी आग लागली. ट्रकमधील 9 मजुरांचा भाजून मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. आता मृतकाच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. टँकरचा चालक (Driver) व वाहक यांचा मृत्यू झाला. तसेच लाकूड भरलेल्या ट्रकमधील सात जणांचा मृत्यू झाला. या सर्वांच्या कुटुंबीयांना प्रत्येक पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली.

अशी घडली घटना

आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये होते. प्लास्टिक पोत्यांमधून हे मृतदेह चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यातील टँकरमधील चालक अमरावती येथील हाफीज खान आणि वाहक वर्धा येथील संजय पाटील यांचाही यात मृत्यू झाला. लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा अपघातात कोळसा झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी होते.

मृतकांची नावं

अमरावती येथील चालक हाफीज खान व वर्धा येथील वाहक संजय पाटील यांचाही यात मृत्यू झाला. तसेच अजय डोंगरे (वय 30) रा. बल्लारपूर व संदीप आत्राम (वय 22) रा. कोठारी यांचाही मृत्यू झाला. इतर सर्व मृतक लावारी दहेली येळीतील आहेत. त्यांची प्रशांत नगराळे ( 33), मंगेश टिपले (वय 30), भय्यालाल परचाके (वय 24), बाळकृष्ण तेलंग (वय 57) साईनाथ कोडाप (वय 40) अशी नावं आहेत. या मृतकांच्या कुटुंबीयांना आता आर्थिक मदत मिळणार आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...