AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Accident | चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत, मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाख, 9 मजुरांचा भाजून मृत्यू

आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये होते. प्लास्टिक पोत्यांमधून हे मृतदेह चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

Chandrapur Accident | चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत, मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाख, 9 मजुरांचा भाजून मृत्यू
चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदतImage Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: May 21, 2022 | 4:44 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल ( Chandrapur-Mul) महामार्गावर अजयपूर (Ajaypur) येथे दोन दिवसांपूर्वी अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही रक्क्म देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघात झाला. यानंतर मोठी आग लागली. ट्रकमधील 9 मजुरांचा भाजून मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. आता मृतकाच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. टँकरचा चालक (Driver) व वाहक यांचा मृत्यू झाला. तसेच लाकूड भरलेल्या ट्रकमधील सात जणांचा मृत्यू झाला. या सर्वांच्या कुटुंबीयांना प्रत्येक पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली.

अशी घडली घटना

आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये होते. प्लास्टिक पोत्यांमधून हे मृतदेह चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यातील टँकरमधील चालक अमरावती येथील हाफीज खान आणि वाहक वर्धा येथील संजय पाटील यांचाही यात मृत्यू झाला. लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा अपघातात कोळसा झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी होते.

मृतकांची नावं

अमरावती येथील चालक हाफीज खान व वर्धा येथील वाहक संजय पाटील यांचाही यात मृत्यू झाला. तसेच अजय डोंगरे (वय 30) रा. बल्लारपूर व संदीप आत्राम (वय 22) रा. कोठारी यांचाही मृत्यू झाला. इतर सर्व मृतक लावारी दहेली येळीतील आहेत. त्यांची प्रशांत नगराळे ( 33), मंगेश टिपले (वय 30), भय्यालाल परचाके (वय 24), बाळकृष्ण तेलंग (वय 57) साईनाथ कोडाप (वय 40) अशी नावं आहेत. या मृतकांच्या कुटुंबीयांना आता आर्थिक मदत मिळणार आहे.

Follow Us
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?