AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किसान सभेचा लाँगमार्च स्थगित; आंदोलनकर्त्यांना अविश्वास दाखवून नये; सरकारला इशारा

किसान सभेनं म्हटले आहे की, लढायचं कसं हे आम्ही शिकलोय त्यामुळे तीन मंत्र्यांनी जी आश्वासने मोर्चेकऱ्यांना दिली आहेत. त्यावर सरकार अविश्वास दाखवणार नाही अशी खात्री वाटत असल्याचंही डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

किसान सभेचा लाँगमार्च स्थगित; आंदोलनकर्त्यांना अविश्वास दाखवून नये; सरकारला इशारा
| Edited By: | Updated on: Apr 27, 2023 | 7:03 PM
Share

धांदरफळ/अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच आता सरकारकडूनही फक्त अश्वासनांची खैरात होत असल्याने किसान सभेने सरकारविरोधात जोरदार आंदोलन पुकारले होते. शेतकरी, महिला, कामगारांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरावर धडक मोर्चा काढत सरकारला इशारा दिला होता. त्यावरूनच किसान सभेचं लाल वादळ रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने आता शेतकऱ्यांना अश्वासन दिले आहे. मात्र सरकारने अश्वासन देऊन शांत बसू नये असा इशाराही किसान सभेच्या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने या पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात कोणतीही मदत करण्यात आली नाही.

वन जमिनी, देवस्थान, इनाम, वक्फ, वरकस, आकारीपड, गायरान व घरांच्या तळ जमिनी, नावे करण्याची वारंवार आश्वासने दिली गेली.

त्यामुळे शेतकऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र जमीन नावे करण्याऐवजी पोलीस व वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे व जमिनींवरून हुसकावून काढण्याच्या मोहिमा सुरू करण्यात आल्या.

सरकारच्या या अश्वासनांमुळे किसान सभेच्या आंदोलन कर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर राज्याच्या तीन मंत्र्यांच्या शिष्टाईनंतर किसान सभेने शेतकरी आणि कामगार प्रश्नी काढलेला लाँगमार्च स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्याने किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. कोणत्याही आंदोलनात शंभर टक्के यश मिळतेच अस नाही आणि आंदोलने देखील संपत नाहीत असंही त्यांनी यावेली स्पष्ट केले.

जेव्हा जेव्हा शेतकरी आणि कामगार यांचा प्रश्न समोर येईल त्या-त्यावेळी किसान सभा संघर्ष करत राहिल असा इशाराही किसान सभेने दिला आहे.

यावेळी किसान सभेनं म्हटले आहे की, लढायचं कसं हे आम्ही शिकलोय त्यामुळे तीन मंत्र्यांनी जी आश्वासने मोर्चेकऱ्यांना दिली आहेत. त्यावर सरकार अविश्वास दाखवणार नाही अशी खात्री वाटत असल्याचंही डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.