AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात ‘या’ व्हिडीओची चर्चा, रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी परिसराचा Video व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराज (Chh. Shivaji Maharaj) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड (Raigad) किल्ल्यावरील एक व्हिडीओ (viral video) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे

राज्यात 'या' व्हिडीओची चर्चा, रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी परिसराचा Video व्हायरल
रायगडावर कुणी अस्थी ठेवण्याचा प्रयत्न केला? दोन संशयीतांमुळे वाद
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 02, 2021 | 8:49 AM
Share

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज (Chh. Shivaji Maharaj) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड (Raigad) किल्ल्यावरील एक व्हिडीओ (viral video) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रायगडावर देखील पावसाच्या जोरदार सरी आणि प्रचंड सोसाट्याचा वारा सुटला होता. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करायला गेलेल्या शिवप्रेमीनं रायगडावरील ही दृश्य कॅमेरात टिपली आहेत. सध्या व्हाटसअ‌ॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. अनेकांच्या व्हाटसअ‌ॅप स्टेटसला हाच व्हिडीओ पाहयाला मिळत आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

महाराष्ट्रात कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावरील एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. प्रचंड सोसाट्याचा वारा आणि वरुन कोसळणाऱ्या पावसाच्या सरी या व्हिडीओत दिसून येत आहेत. या व्हिडीओत रायगडावरील राजसदरेवर पाऊस कैद झालेला आहे. राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील पुतळा अगदी मनमोहक दिसत आहे.

दे धक्का चित्रपटातील गीताचा वापर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरातील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये 2008 साली प्रदर्शित झालेल्या दे धक्का चित्रपटातील वाट चालावी चालावी या गीताचा वापर करण्यात आला आहे. हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडला भेट देणार

खासदार संभाजी छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. राष्ट्रपती 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणं ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले आहेत.

इतर बातम्या

नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन प्रशिक्षण, असा करा अर्ज!

राज्यातील 50 हजार खेड्यांत आरोग्य यंत्रणाच नाही, कशी थोपवणार तिसरी लाट? औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

Chhatrapati Shivaji Maharaj Raigad Rain video viral on Social Media

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.