Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, गेल्या 3 दिवसांत नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 11, 2022 | 8:08 PM

सिरोंचा, आलापल्ली, तेलंगणा राष्ट्रीय महामार्ग मागील दोन दिवसापासून पूर्णपणे बंद होता. या राष्ट्रीय महामार्गावर बामणी, मेडारम, रेपनपल्ली हे छोटे नाले राष्ट्रीय महामार्गावरून वाहत होते. हा राष्ट्रीय महामार्ग आज सुरू झाला.

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, गेल्या 3 दिवसांत नेमकं काय घडलं?
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अशी पूर परिस्थिती आहे.
Image Credit source: t v 9
Follow us on

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी ते सातपर्यंत गडचिरोली पोहचतील. त्यानंतर ते अधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा (review of flood situation) घेतील. एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यामुळं त्यांना गडचिरोली जिल्ह्माची चांगली जाण आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाच्या फटका अनेक नदी-नाल्यांना बसलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता (Pranhita), गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा या नद्यांना पूर आला आहे. महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागात असलेल्या मेडीगट्टा धरणाचे (Medigatta Dam) 81 दरवाजे सोडण्यात आले. त्यातून मोठ्या पाण्याचा विसर्ग होत आहे. बॅक वॉटरचा फटका गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा बसण्याच्या संकेत आहेत.

हे सुद्धा वाचा

3 दिवस 70 गावांचा संपर्क तुटला

गेल्या तीन दिवसांपासून भामरागड तालुक्याचा व तालुक्‍यातील 70 गावांचा तालुका, व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. आलापल्ली भामरागड छत्तीसगड हा राष्ट्रीय महामार्गाच्या काम सुरू असून का मग रस्त्यात काम केल्याने हा रस्ता वाहून गेला. भामरागड तालुक्यात मागील दोन दिवसांअगोदर एक ट्रक वाहून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. विद्युत विभागाच्या एका कर्मचाऱ्याचाही पाण्यात अंदाज ना टाळल्यामुळे मृत्यू झाला.

सिरोंचाचा 2 दिवस तेलंगणाशी संपर्क नाही

सिरोंचा, आलापल्ली, तेलंगणा राष्ट्रीय महामार्ग मागील दोन दिवसापासून पूर्णपणे बंद होता. या राष्ट्रीय महामार्गावर बामणी, मेडारम, रेपनपल्ली हे छोटे नाले राष्ट्रीय महामार्गावरून वाहत होते. हा राष्ट्रीय महामार्ग आज सुरू झाला. परंतु दोन दिवस बंद असल्यामुळे वाहतूक ठप्प होती. अहेरी तालुका मुख्यालयी तलावाच्या पाण्यात वाढ झाली. अहेरीतील प्रभाग नंबर 14 व 15 मध्ये जवळपास वीस ते बावीस घरांमध्ये पाणी शिरले होते. त्या सर्व परिस्थितीवर अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात NDRF पथक असून हे पथक व परिस्थितीबाबत प्रत्येक क्षणाची अपडेट घेत आहेत.