AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर चित्रफितीचा धुमाकूळ, पोलीस अधीक्षक म्हणतात, घाबरू नका

अफवांवर विश्वास ठेवू नका. लहान मुलांना पळवून नेण्याची घटना अकोला जिल्ह्यात किंवा आजू बाजूच्या जिल्ह्यात कोठेही घडली नाही. जिल्ह्यात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटनेची नोंद नाही.

सोशल मीडियावर चित्रफितीचा धुमाकूळ, पोलीस अधीक्षक म्हणतात, घाबरू नका
पोलीस अधीक्षक म्हणतात, घाबरू नकाImage Credit source: t v 9
| Updated on: Sep 21, 2022 | 6:02 PM
Share

गणेश सोनोने, अकोला : सध्या सोशल मीडियावर (Social Media) फिरणाऱ्या एका चित्रफितीने (Films) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र ही केवळ एक अफवाच आहे. अशा प्रकारची घटना अकोला किंवा शेजारच्या जिल्ह्यात कुठेही घडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत (Monica Raut) यांनी केले आहे.

अकोला जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरविली जात आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नसल्याचे अप्पर पोलीस अधीक्षकांनी जाहीर केलं.

अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. लहान मुलांना पळवून नेण्याची घटना अकोला जिल्ह्यात किंवा आजू बाजूच्या जिल्ह्यात कोठेही घडली नाही. जिल्ह्यात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटनेची नोंद नाही.

अशी कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नसल्याचा दावाही पोलिसांनी केला. पालकांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे. आपली मुलं शाळेमध्ये ट्युशनला किंवा बाहेर जाताना त्याच्यावर लक्ष ठेवावे. असं आवाहनही पोलीस विभागाकडून करण्यात आलेलं आहे.

परंतु, ही सोशल मीडियावरील चित्रफित पाहून काही लोकं भयभित झाले आहेत. या चित्रफितीमुळं आपली मुलं सुरक्षित तर नाहीत ना, अशी शंका नागरिकांना येत आहे.

परंतु, पोलीस ठाण्यात बालकं पळविल्याची अद्याप नोंद नाही. त्यामुळं अशी टोळी असल्याची चित्रफित ही खोटी आहे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पण, आपल्या पालकांकडं लक्ष ठेवा, असंही आवाहन पोलिसांनी केलंय.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.