AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीत पंकजाताईंचाच दबदबा, बँकेच्या निवडणूकीत संपूर्ण पॅनलचा दणदणीत विजय

बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ बँकेवर मंत्री पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम राहिले आहे. संचालक मंडळ निवडणुकीत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत.

परळीत पंकजाताईंचाच दबदबा, बँकेच्या निवडणूकीत संपूर्ण पॅनलचा दणदणीत विजय
Pankaja Munde
| Updated on: Aug 12, 2025 | 9:36 PM
Share

बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ बँकेवर मंत्री पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम राहिले आहे. संचालक मंडळ निवडणुकीत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत. या बँकेत 17 सदस्यीय संचालक मंडळ आहेत. मात्र यातील चार उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर 13 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले होते. आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. यात सर्व 13 जागा पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने जिंकल्या आहेत.

या विजयानंतर माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह संचालक मंडळ लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची समाधी असलेल्या गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले. यावेळी बोलताना माजी खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, ‘बँकेचे पॅनल हे निश्चितच निवडून येणार होते हा आम्हाला विश्वास होता. जेव्हा वैद्यनाथ बँकेचा विषय येतो, सर्वसामान्य माणूस वैद्यनाथ बँकेचा खातेदार आहे. ही मुंडे साहेबांची बँक आहे हा एक विश्वास आहे. या विश्वासाच्या अनुषंगाने विजय निश्चित आमचा होणार असा विश्वास होता.

पुढे बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, ‘या निवडणुकीकडे आम्ही पक्ष राजकारण म्हणून बघत नाही. विरोधात कोणत्या पक्षाचे लोक होते आणि काय अशा गोष्टीकडं न बघता वैद्यनाथ बँकेची निवडणूक सर्वसामान्य माणसाची निवडणूक होती. निवडणुकीची टर्म दुसरी असली तरी, अनुभव मात्र तीन टमचा आला असेल म्हणायला हरकत नाही. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली हा जो चढता आलेख आहे असाच आम्ही ठेवू शकू मला विश्वास आहे.’

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला आहे. विजयी उमेदवारांमध्ये विनोद सामत, प्रकाश जोशी, डॉ. राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, विजय वाककेर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री, रमेश कराड यांचा समावेश आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.