AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माफ करा महाराज… या पेशव्यांच्या वंशजांनी तीन-चार महिन्यात…”, महाविकासआघाडीच्या व्हिडीओतून जोरदार हल्ला

सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.

माफ करा महाराज... या पेशव्यांच्या वंशजांनी तीन-चार महिन्यात..., महाविकासआघाडीच्या व्हिडीओतून जोरदार हल्ला
| Updated on: Aug 28, 2024 | 2:39 PM
Share

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर महाविकासाआघाडीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. “माफ करा महाराज” अशा आशयाचा हा व्हिडीओ आहे.

काय म्हटलंय व्हिडीओत?

“माफ करा महाराज, माफ करा. तुमच्या पुतळ्याच्या अवस्थेलाच आम्हीच कारणीभूत आहोत. महाराज आम्ही यांच्या मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासनांना बळी पडलो. आम्हाला माती आणि सोन्यातला फरकच कळला नाही. महाराज तुम्ही उभारलेल्या गडकिल्ल्यांचा प्रत्येक दगड शाबूत आहे. पण भ्रष्ट युतीने उभारलेला पुतळा आठ महिनेही टिकला नाही. महाराज तुम्ही स्वराज्याचं हित पाहिलं, रयतेचं हित पाहिलं. पण या भ्रष्ट युतीच्या नेत्यांनी स्वत:चंच भलं केलं. महाराज आम्हीच दोषी आहोत. कारण आम्ही तुमच्या पुतळ्यांच्या बाबतीत नेते म्हणून यांच्यावर भरवसा टाकला. पण यांनी कमिशनसाठी लाडका कॉन्ट्रॅक्टरच गाठला.

महाराज तुमचं नाव घेऊन सत्तेत येणारी लोकं, तुमच्यासोबतही नीच वागली. घात झाला महाराज… घात झाला… इथेच आमच्या वेड्या भावनेचा घात झाला. तुमच्या पुतळ्यांमध्येही यांनी टक्केवारीचाच डाव केला. पुतळा निर्मिताला दोन वर्ष लागतात पण निवडणुकीच्या तोंडावर या पेशव्यांच्या वंशजांनी तीन चार महिन्यात घाईत पुतळा निर्माण केला. महाराज सिमेंटमध्ये जान असून चालत नाही काम करणाऱ्यांच्या रक्तात इमान असायला पाहिजे, याचा आम्हाला विसर पडला. तुमच्या लोककल्याणकारी विचारांना पायदळी तुडवून यांनी मोठा अपराध केला. निवडणुकीसाठी फक्त तुमच्या नावाचा जयघोष केला महाराज. यांना कधीही महाराजांच्या विचारांची, तत्त्वांची आणि कार्याची कदरच नव्हती. त्यामुळेच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची अशी अवस्था केली. यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे. दुसरं काहीही नाही. पण माफ करा महाराज या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो. आम्ही कधीकाळी डोक्यावर घेऊन नाचलो. पण आता तुमची शपथ… यांना सोडणार नाही…तुमच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करेपर्यंत…आम्ही शांत बसणार नाही…” असे या व्हिडीओत म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र काल (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे. या घटनेनंतर महाविकासाआघाडीकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Follow Us
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.