AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितेश राणे यांचा ‘वेडा आमदार’ म्हणून उल्लेख, प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

पोलीस स्वत:ला संकटात टाकून, आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत असतात. ते सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात. पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय. असं असताना आता प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केलीय.

नितेश राणे यांचा 'वेडा आमदार' म्हणून उल्लेख, प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 23, 2024 | 8:40 PM
Share

गणेश सोनोने, Tv9 मराठी प्रतिनिधी, अकोला | 23 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार नितेश राणे यांनी गेल्या आठवड्यात पोलिसांवर टीका केली. त्यांनी भाषण करताना पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली. पोलीस स्वत:ला संकटात टाकून, आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत असतात. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात. पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात होता. काही जणांकडून नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी देखील केली जात होती. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी नितेश राणे यांचा ‘वेडा आमदार’ असा उल्लेख केला.

प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेंच्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बोलतांना त्यांना फार महत्त्व देऊ नये असं म्हटलंय. नितेश राणे यांचा उल्लेख त्यांनी ‘वेडा आमदार’ असा केलाय. त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाहीय. यासोबतच पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

“नितेश राणे यांच्यावर कारवाई होऊ शकते. पण पोलिसांनी कारवाई करु नये. दुर्लक्ष करावं. एक वेडा आमदार म्हणतोय, असं म्हणावं आणि सोडून द्यावं. त्याचे परिणाम पुढे घातक होतील असं मला तरी वाटत नाही. ते व्यक्तीमत्वावर अवलंबून असतं. त्यामुळे या वक्तव्याकडे दुर्लक्ष करावं”, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालंय. प्रकाश आंबेडकर यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “मनोहर जोशी यांनी दादर येथे पहिल्यांदार कोहिनुर टेक्निकल सुरु केलं. त्याचा अनेकांना फायदा झाला. तर त्यांचं शिक्षक म्हणून कार्य मोठं आहे. नंतर ते महापौर झाले. मुख्यमंत्री झाले. लोकसभेचे स्पीकर झाले आणि त्यांनी पदावर असतांना अनेक गोष्टी कुशलतेने हॅन्डल केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे हे एक स्वत: मोठं नाव असतांनाही त्यांच्या बरोबरीत मनोहर जोशीचं नाव घेतलं जायचं. त्यातून त्यांचं कर्तृत्व आणि कुशलता खुप मोठी आहे. ते आज आपल्यात नाहीत. त्यांना मी आणि माझ्या परिवाराकडून आदरांजली अर्पण करतो”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Follow Us
पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला....
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट...
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत