
यशवंतराव चव्हाण मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी पहाटे ट्रक उलटला आणि घाटातील ट्रॅफीक दोन्ही दिशेने जवळपास ३२ तास जाम झाले.त्यामुळे देशातील या पहिल्या एक्सेस कंट्रोल द्रुतगती महामार्गाचा फोल पणा उघड झाला आहे का ? असा सवाल केला जात आहे. या मार्गावर मिसिंग लिंकचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. ही मिसिंग लिंक एकदा का सुरु झाली तर प्रवाशांच्या वेळेत अर्धा तासांची बचत होईल असे म्हटले जात आहे. परंतू घाटात वाहनचालकांकडून शिस्तीत वाहने चालविली जात नाहीत. तसेच एखादा अपघात झाला तर मार्ग पटकण मोकळा करण्याची यंत्रणाही आपल्याकडे नसल्याचे या अपघातातून उघड झाले आहे. या मार्गावर अपघात झाला तर त्याची झटपट माहिती डिस्प्ले किंवा मोबाईलवर दिली गेली तर अनेक प्रवासी अन्य पर्यायांचा विचार करुन योग्य निर्णय घेतील त्यामुळे निष्कारण कोंडी होणार नाही असे म्हटले जात...