AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

competitive exams | स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासनाकडे कोट्यवधींचा निधी, रद्द परीक्षांचे पैसे…

maharashtra government competitive exams | राज्यात सध्या विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. जवळपास 75 हजार जागांची भरती होणार आहे. या भरतीसाठी आकारलेल्या जाणाऱ्या शुल्कासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे.

competitive exams | स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासनाकडे कोट्यवधींचा निधी, रद्द परीक्षांचे पैसे...
| Updated on: Oct 19, 2023 | 3:50 PM
Share

पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला जात असल्यामुळे राज्य सरकारने मागील वर्षी मोठा निर्णय घेतला होता. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे राज्यातही 75 हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही भरती राज्यातील विविध विभागात करण्यात येत आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षांच्या माध्यमातून शासनाकडे कोट्यवधी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. ती माहिती समोर आली आहे.

पाच वर्षांत किती जमा झाला निधी

राज्य शासनाने गेल्या 5 वर्षात विविध पदासाठी स्पर्धा परीक्षा घेऊन भरती केली आहे. सरकारी नोकरीसाठी होणाऱ्या या भरतीसाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क जमा झाले आहे. त्यातून शासनाकडे जवळपास 334 कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात चालू वर्षांतच शासनांकडे 267 कोटी रुपये जमा झाले आहे. चालू वर्षांत पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, महानगरपालिका भरती, तलाठी भरती आणि एमपीएससीसाठी परीक्षा घेण्यात आल्या.

किती जागा आहेत रिक्त

राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा सुमारे 2 लाख 44 हजार 405 जागा रिक्त असल्याचा दावा केला जात आहे. राज्यातील रिक्त झालेल्या पदांची एकूण संख्या टक्केवारीत 23 टक्के आहे. यामुळे दीर्घ कालवाधीनंतर राज्यात 75 हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. काही भरती एमपीएससीमार्फत तर काही भरती इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून होत आहे.

रद्द झालेल्या परीक्षांमधून कमाई

राज्य शासनाने भरतीसाठी जाहिरात काढल्या. परंतु काही कारणांमुळे भरती झालेली नाही आणि परीक्षाही झालेली नाही. अशा अनेक परीक्षा आहेत. या रद्द झालेल्या भरतीमध्ये परीक्षा शुल्काचे ६७ कोटी रुपये शासनाकडे जमा झाले आहेत. भरती रद्द झाली तरी हे पैसे विद्यार्थ्यांना परत दिले नसल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी अनेकवेळा मुद्दा उपस्थित केला. परंतु अजूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.