AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे येथील 80 मुलांना विषबाधा, दुपारी जेवण करताचा झाला त्रास

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या आधिक आहे. मुलांना त्रास झाल्यानंतर त्यांना चांडोली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यांवर उपचार करणारे डॉक्टरच दारुच्या नशेत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पुणे येथील 80 मुलांना विषबाधा, दुपारी जेवण करताचा झाला त्रास
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Feb 09, 2023 | 6:55 PM
Share

राजगुरुनगर, पुणे : विद्यार्थ्यांना शाळेत दिला जाणारा पोषण आहारच त्यांच्यांसाठी बाधक ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. सुमारे 80 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे जवळील राजगुरुनगर शहरातील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील 80 मुलांना विषबाधा झाली आहे. या प्रकारामुळे पालकही संतप्त झाले आहे. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

हुतात्मा राजगुरु विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या विद्यार्थ्यांनी दुपारी जेवण केले.शाळेतून देण्यात येणार पोषण आहार या विद्यार्थ्यांनी खाल्ला होता.शाळेत पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. तो खाल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाला. सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुलींची संख्या आधिक

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या आधिक आहे. मुलांना त्रास झाल्यानंतर त्यांना चांडोली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यांवर उपचार करणारे डॉक्टरच दारुच्या नशेत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालकांना मुलांना भेटू दिले नाही. यामुळे पालक संतप्त झाले आहेत.

दोन आठवड्यांपुर्वी सांगलीत घटना

सांगली येथील सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार २७ जानेवारी रोजी समोर आला होता. विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहार मधून विषबाधा झाल्याचा समोर आला होता. मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलून दाखवलं. मात्र, त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात होते.

Follow Us
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.