AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर असे फोटो शेअर करणे दोघांना पडले महागात, खावी लागली पोलीस ठाण्याची हवा

Pune Cirme News : सोशल मीडियाची क्रेझ तरुणाईमध्ये चांगलीच आहे. आपले फोटो सातत्याने सोशल मीडियावर तरुणाई अपडेट करीत असतात. परंतु दोन जणांना असे फोटो अपडेट करणे चांगले अंगलट आलेय.

सोशल मीडियावर असे फोटो शेअर करणे दोघांना पडले महागात, खावी लागली पोलीस ठाण्याची हवा
पुण्यात नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळला
| Updated on: Jul 11, 2023 | 2:07 PM
Share

पुणे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहे. अनेक जण सोशल मीडियावर आपले अनेक फोटो टाकत असतात. परंतु सोशल मीडियावर फोटो टाकताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण पुणे शहरातील दोन तरुणांना सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंमुळे कारागृहाची हवा खावी लागली. राज्य पोलिसांचे लक्ष तुमच्या सोशल मीडिया अकांऊटवर असते. त्यामुळे गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण करणारे फोटो दिसल्यास त्वरित कारवाई होत आहे.

काय आहे पुणे येथील प्रकार

पुणे शहरातील दोन तरुणांनी आपले फोटो सोशल मीडियावर टाकले. शस्त्रांसह त्यांनी हे फोटो शेअर केले. पोलिसांना हा प्रकार समजला. त्यानंतर अरशद शरीफ पटेल (वय २१) उमर सलमी शेख (वय १९) या दोन्हांना उरळी देवाची भागातून अटक करण्यात आली. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांचे ऑपरेशन अन्…

पुणे पोलिसांनी ८ जुलै रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. त्यावेळी पोलिसांना दोन तरुण शस्त्रांसह आपले फोटो शेअर करत असल्याची माहिती मिळाली. हडपसर विभागानेच पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी त्यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी असे फोटो शेअर केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्र जप्त केले आहे.

कोयता गँगमुळे पोलिसांचे लक्ष

पुणे शहरात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे कोयता गँगचा निपटारा करण्यासाठी पोलिसांचे बारीक लक्ष गुन्हेगारांवर आहे. पुणे शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांचे अनेक प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी आयुक्त रस्त्यावर उतरले. अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.