AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid update : राज्यातली ही ‘पॉझिटिव्हिटी’ वाढली! कोविड रुग्णांचे प्रमाण तीन महिन्यांत प्रथमच 10 हजारांच्या खाली!

SARS-CoV-2 यामधील BA.5 सबवेरियंटमध्ये महाराष्ट्र काहीसा चांगल्या स्थितीत आहे. म्हणजेच याचा प्रसार टाळण्यात राज्याला यश आले आहे, असे दिसते. कारण आता राज्यातील नमुन्यांमध्ये 5%पेक्षा रुग्ण या व्हेरिएंटमधील असल्याचे दिसून आले आहे.

Covid update : राज्यातली ही 'पॉझिटिव्हिटी' वाढली! कोविड रुग्णांचे प्रमाण तीन महिन्यांत प्रथमच 10 हजारांच्या खाली!
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Sep 07, 2022 | 10:30 AM
Share

पुणे : महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह कोविड रुग्णांची संख्या (Active Covid patients) आता तीन महिन्यांत प्रथमच 10,000च्या खाली गेली आहे. जून अखेरीस राज्यात 25,000हून अधिक अॅक्टिव्ह केसेस लक्षात घेता ही एक मोठी घटना आहे. हवामानातील बदलांमुळे (Climate change) कोविडच्या केसेस कमी झाल्या आहेत. शिवाय स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही घट झाली आहे. इन्फ्लूएंझा आणि कोविडचा प्रसार जवळजवळ सारखाच आहे. वाढलेला पाऊस आणि आर्द्रता यामुळे प्रसार होण्यास चालना मिळते. कारण SARS-CoV-2 आणि इन्फ्लूएंझा विषाणू (Influenza) हवेतील आर्द्रतेच्या थेंबांवर पिगीबॅक करू शकतात, असे राज्य निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी नोंदविले. दरम्यान, यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही कमी झाले असल्याचे डॉक्टरांतर्फे सांगण्यात आले आहे. पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि निरभ्र आकाश याचा हा परिणाम आहे.

सक्रिय रुग्णांचा आकडा कमी

आकडेवारीनुसार 9 जूनच्या आसपास महाराष्ट्रात 11,571 सक्रिय कोविड रुग्ण होते. 19 जूनच्या आसपास ही संख्या 23,746वर पोहोचली आणि 27 जूनपर्यंत सक्रिय रुग्ण 25,570वर होते. पण 8 ऑगस्टपर्यंत रुग्णांची संख्या निम्म्याहून कमी होऊन 11,900वर आली आणि ऑगस्ट अखेरीस ती 10,633वर आली. मंगळवारी, राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 7,701वर होता.

प्रसार टाळण्यात राज्याला यश

SARS-CoV-2 यामधील BA.5 सबवेरियंटमध्ये महाराष्ट्र काहीसा चांगल्या स्थितीत आहे. म्हणजेच याचा प्रसार टाळण्यात राज्याला यश आले आहे, असे दिसते. कारण आता राज्यातील नमुन्यांमध्ये 5%पेक्षा रुग्ण या व्हेरिएंटमधील असल्याचे दिसून आले आहे.

‘हॉस्पिटलायझेशन होण्याचे प्रमाण कमी’

भारताच्या INSACOG नेटवर्कचे सदस्य डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, की BA.5मुळे काही देशांतील रूग्णांमध्ये गंभीर संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात सौम्य BA.2.75 सबव्हेरिएंटचा 75% प्रसार नोंदवला जात आहे, ज्यामुळे हॉस्पिटलायझेशन होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

‘केसेसचे प्रमाण जास्त असले तरी लक्षणे सौम्य’

डॉ आवटे म्हणाले, की आम्ही BA.2.75 संसर्गामध्ये वाढ पाहत आहोत, परंतु केसेसचे प्रमाण जास्त असले तरी लक्षणे सौम्य आहेत आणि लोक घरीच बरे होत आहेत. पुणे, मुंबई आणि ठाणे येथील नमुन्यांमध्ये BA.2.75चे प्रमाण जास्त आहे. प्रयोगशाळेनुसार, राज्यात 20 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान 21 BA.5 रुग्ण आणि 216 BA.2.75 रुग्ण आढळले आहेत.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?